नवी दिल्ली - चौथ्या टाळेबंदीत नियम शिथिल केल्यानंतर फोर्स मोटर्सने उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आकुर्डी, चाकण आणि चेन्नईमधील उत्पादन प्रकल्पाचा समावेश आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे फोर्स मोटर्सने २१ मार्चला उत्पादन प्रकल्प बंद केल्याची घोषणा केली होती. सध्या, उत्पादन प्रकल्पांमध्ये ३३ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. नियम शिथील केल्यानंतर वेळोवेळी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मनुष्यबळाची सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.