कोची - आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला केंद्र सरकार आर्थिक पॅकेज देणार आहे. त्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. ते एनडीए सरकारने १०० दिवस पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.
अर्जुन राम मेघवाल म्हणाले, बीएसएनएलला प्रोत्साहन देणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बीएसएनएलला सरकारकडून काही पॅकेज हवे आहे. त्यांनी चांगले काम करावे, अशी आमची इच्छा आहे. बीएसएनएलला भविष्यात पॅकेजला दिलेले तुम्हाला दिसेल, असेही त्यांनी सांगितले. बीएसएनएलने पॅकेजसाठी पाठविलेला प्रस्ताव हा वित्तीय मंत्रालयाकडे आहे.
हेही वाचा-सीलबंद पाण्याच्या बाटलीसाठी प्लास्टिकला पर्याय शोधा, रामविलास पासवान यांची उत्पादकांना सूचना