महाराष्ट्र

maharashtra

JITO Connect 2022 : जग भारताकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत आहे - पंतप्रधान

By

Published : May 6, 2022, 12:16 PM IST

Updated : May 7, 2022, 10:38 AM IST

तीन दिवसीय 'जिटो कनेक्ट ( JITO Connect 2022 )च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. जग भारताकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत असल्याचही मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान
पंतप्रधान

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (6 मे)रोजी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने आयोजित केलेल्या 'जीतो कनेक्ट-2022' च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. ( PM Narendra Modi Addressed ) जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ही जगभरातील जैन समाजाला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी जागतिक संस्था आहे. दरम्यान, मोदी म्हणाले जग भारताकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत आहे.

आज जग भारताच्या विकासाच्या संकल्पाला आपली उद्दिष्टे गाठण्याचे साधन मानत असल्याचे मोदी म्हणाले. ( Jito Connect Session 2022 ) जागतिक शांतता असो, जागतिक विकास असो, जागतिक आव्हानांवर उपाय असो किंवा जागतिक पुरवठा साखळींचे सक्षमीकरण असो, जग भारताकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हापासून गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस म्हणजेच (Modi to address inaugural session)पोर्टल अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून सर्व खरेदी सर्वांसमोर एका प्लॅटफॉर्मवर केली जाते. आता दुर्गम खेड्यातील लोक, छोटे दुकानदार आणि बचत गटांना आपला माल थेट सरकारला विकता येणार आहे असही ते म्हणाले आहेत.

कनेक्ट परिषदेचे उद्घाटन, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांनी संवाद साधला, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला धरून जीतो ची थीम आहे, ज्या मध्ये जगभरातील भारतीय लोकांच्या नवीनकल्पना आणि लोकांच्यात नवीन विश्वास आशावाद दिसून येत आहे जागतिक शांततेच्या दृष्टीने जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे देशातील कर व्यवस्था पारदर्शक असून ती आता ऑनलाइन होत आहे त्यामुळे व्यापारांनी ऑनलाइन पारदर्शक व्यवहार करण्यासाठी आग्रही राहावे असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले

गंगाधाम कात्रज कोंढवा, रस्त्यावर वर्धमान लॉन्स समोर जीतो कंनेक्ट 2022 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या वेळी केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्री नितिन गडकरी तरी उद्योजक प्रकाश धारिवाल उद्योजक नरेंद्र बलदोटा आमदार माधुरी मिसाळ मुख्य उद्योजक विनोद विनोद चेअरमन गणपत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते, पंतप्रधान मोदी म्हणाले नवतरुण वर्गाने पर्यावरण, देशी उद्योग, पुनर्वापर क्षेत्रात, नवनवीन स्टार्टअप सुरू करावेत, तसेच दुर्गम भागातील उत्पादक, बचत गट यांचे उत्पादक हे सरकारला ऑनलाईन विक्री करु शकत आहेत.

सरकारी पोर्टलवर,सुमारे 40 लाख उत्पादकांची नव्याने नोंद केली असून आता दहा लाख लोक मागील पाच महिन्यात जोडले गेले आहेत, जैन समाजाचे नेहमीच भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाली तर नवउद्योजकांना उभारी मिळेल त्यासाठी स्वदेशी वस्तू वापरण्यास भर द्या त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्माण मध्ये जैन समाज महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो असे असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला

हेही वाचा -100 सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन, वाचा... आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्याविषयी

Last Updated : May 7, 2022, 10:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details