महाराष्ट्र

maharashtra

भाजपला घरचा आहेर, सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले भाजपमध्ये कुठेही निवडणूक होत नाही, सर्व मोदींच्या मंजुरीनेच

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीत बुधवारी मोठे फेरबदल Subramanian Swamy criticize pm modi झाल्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान Subramanian Swamy on parliamentary party elections यांना संसदीय मंडळातून काढण्यात आले आहे. अशात आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून भाजपच्या जुन्या परंपरेची आठवण करून दिली आहे.

By

Published : Aug 18, 2022, 2:29 PM IST

Published : Aug 18, 2022, 2:29 PM IST

Subramanian Swamy criticize pm modi
पंतप्रधान मोदी यांच्यावर सुब्रम्हण्यम स्वामी यांची टीका

नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीत बुधवारी मोठे फेरबदल Subramanian Swamy criticize pm modi झाल्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना संसदीय मंडळातून काढण्यात आले आहे. अशात आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून Subramanian Swamy on parliamentary party elections भाजपच्या जुन्या परंपरेची आठवण करून दिली आहे. एका ट्विटर युजरला उत्तर देताना त्यांनी पक्षातील लोकशाही संपल्याचे मान्य केले आहे.

हेही वाचाShri Krishna Janmashtami मथुरेत श्री कृष्ण जन्माष्ठमीनिमीत्त यमुना घाट सजला

जनता पक्षाच्या काळात पूर्वी संसदीय पक्षाची निवड व्हायची ज्याद्वारे पदाधिकारी निवडले जात होते. पक्षाच्या संविधानानुसार असे करणे गरजेचे असयाचे. मात्र आज भाजपमध्ये कुठेही निवडणूक नाही. प्रत्येक पदाची निवड नामांकनाच्या आधारे केली जाते आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घ्यावी लागते, अशी खंत सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली होती. त्यावर एकाने पक्षांतर्गत लोकशाही नाही, मग ते देशातील लोकशाही कशी वाचवणार असे कमेंट केले होते. यावर तुम्हाला हे आता कळले, असे उत्तर सुब्रमण्य स्वामी यांनी केले आहे. यावरून स्वामी भाजपच्या कार्यपद्धतीशी सहमत नसल्याचे समजून येत आहे.


भाजपने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जेपी नड्डा हे या संसदीय मंडळाचे आणि भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. सर्वानंद सोनोवाल आणि बीएस येदियुरप्पा यांचा भाजपच्या बोर्डात समावेश करण्यात आला आहे. संसदीय मंडळ ही भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था आहे. पक्षाचे सर्व मोठे निर्णय या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळात स्थान मिळाले नाही, परंतु त्यांना निवडणूक समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय वनमंत्री भूपेंद्र यादव आणि मूळचे राजस्थानचे असलेले ओम माथूर यांनाही या निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. गडकरी आणि शिवराज चौहान यांना संसदीय बोर्डातून काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांचे हे ट्विट आल्याने पक्षात नाराजी आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचाAndhrapradesh News आंध्र मंदिरात भाविक देवाला विंचू अर्पण करतात

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details