महाराष्ट्र

maharashtra

जस्टीस नूथलपती वेंकट रमना भारताचे नवे सरन्यायाधीश

जस्टीस नूथलपती वेंकट रमना यांनी भारताच्या 48 व्या मुख्य न्यायाधीश पदाची आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.

By

Published : Apr 24, 2021, 11:56 AM IST

Published : Apr 24, 2021, 11:56 AM IST

Updated : Apr 24, 2021, 1:22 PM IST

Delhi
Delhi

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश असलेल्या नूथलपती वेंकट रमना यांनी भारताच्या 48 व्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (24 एप्रिल) सकाळी 11 वाजता रामणा यांना एका समारंभात शपथ दिली.

न्यायमूर्ती एन.व्ही. रामना यांनी देशाच्या 48 व्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. न्यायमूर्ती रमना यांचा कार्यकाळ मुख्य न्यायाधीश म्हणून 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम गावात 27 ऑगस्ट 1957 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला होता.

जस्टीस नूथलपती वेंकट रमणा भारताचे नवे सर न्यायाधीश

न्यायमूर्ती रमना यांच्याआयुष्यातील काही खास कामगिरी -

  • 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीपूर्वी न्यायमूर्ती रामना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
  • ते भारतीय रेल्वेसह विविध सरकारी संस्थांचे पॅनेल वकील होते आणि आंध्र प्रदेश राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते दिवाणी व गुन्हेगारी बाजूंनी खास आहे आणि राज्यघटना, कामगार, सेवा, आंतरराज्यीय नदीतील वाद आणि निवडणुकांशी संबंधित वकिलांचा अनुभव आहे.
  • 27 जून 2000 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
  • 10 मार्च 2013 ते 20 मे 2013 पर्यंत त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले.
  • आंध्र प्रदेश न्यायिक अकादमीचे अध्यक्षपद सांभाळताना न्यायमूर्ती रमना यांनी भारतीय कायदेशीर व्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.
    जस्टीस नूथलपती वेंकट रमणा भारताचे नवे सर न्यायाधीश

अर्ध-न्यायिक अधिकारी, केंद्रीय कामगार विभागाचे आयुक्त आणि सहकार खात्याचे कुलसचिव यांच्याकडून ज्युडिशियल सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यासारख्या अधिकाऱयांच्या प्रशिक्षणात त्यांनी मोठे बदल केले. न्यायिक अॅकॅडमीचे अध्यक्ष असताना त्यांनी सर्व रँक न्यायिक अधिकाऱ्यांसाठी भारताच्या इतिहासाच पहिल्यांदा संयुक्त संम्मेलन आयोजित केले. या संम्मेलनात पोलीस अधिकारी, सुधारात्मक सेवा अधिकारी, बाल न्याय मंडळे, अधिवक्ता, फिर्यादी, महिला संस्था, सामाजिक गट आणि माध्यमांचे प्रतिनिधींना देखील बोलावण्यात आले होते. महिलांवरील वाढत्या लैंगिक गुन्हेगारीच्या धोक्याबद्दल बोलणे, हा संम्मेलनाचा हेतू होता.

Last Updated : Apr 24, 2021, 1:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details