महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Opposition protest over inflation: संसदेत महागाई विरोधात आंदोलन, राहुल गांधी सहभागी, राज्यसभा, लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित

काँग्रससह विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी संसद परिसरात आंदोलन केले. मुख्यतः महागाई विरोधात हे आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी या आंदोलनात सहभागी झाले होते (Opposition protest over inflation).

By

Published : Jul 19, 2022, 10:47 AM IST

Updated : Jul 19, 2022, 11:13 AM IST

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत महागाई विरोधात आंदोलन, राहुल गांधी सहभागी
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत महागाई विरोधात आंदोलन, राहुल गांधी सहभागी

नवी दिल्ली -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत महागाई आणि महागाई या मुद्द्यांवर विरोधकांच्या निदर्शनात सामील झाले. संसदेच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी आज सकाळपासूनच महागाईवरुन आंदोलनास सुरुवात केली आहे. जोरदार घोषणाबाजी तसेच पोस्टरबाजीसह विरोधक मोदीसरकारवर हल्लाबोल करत आहेत (Opposition protest over inflation).

राज्यसभेचे कामकाज स्थगित - संसद परिसरातील आंदोलनाचे पडसाद संसदेतही दिसून येत आहेत. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यातच अवघ्या दोन मिनिटीत राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्याची घोषणा उपराष्ट्रपती तसेच पीठासीन अधिकारी व्यंकय्या नायडू यांनी केली. लोकसभेचे कामकाजही सुरू झाले आहे. प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे. मात्र लोकसभेतही विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे. हौद्यात उतरुन विरोधी खासदार घोषणाबाजी करत आहेत. पोस्टर घेऊन विरोधकांची निदर्शने सभागृहात सुरू आहे. विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न सभापती ओम बिर्ला यांनी केला. महागाईवर यापूर्वी चर्चाची संधी दिली होती. मात्र खासदारांचा गोंधळ सुरू होता. त्यातच सभापतींनी दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.

पंतप्रधानांचे आवाहन - संसदेचे पावसाळी अधिवेशन कालपासून ( Monsoon Session ) सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशासाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. हा काळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आहे. आगामी 15 ऑगस्ट आणि त्यापुढील 25 वर्षांचे विशेष महत्त्व आहे. कारण आता देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे तर 25 वर्षांनी देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा आपला प्रवास आणि आपण ज्या नवीन उंची गाठू, ते ठरवण्याचा संकल्प करण्याची वेळ आलेली आहे.

देशासाठी हा काळ महत्त्वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदीराष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवड - या अधिवेशना दरम्यान देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे. आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. देशभरातील विधिमंडळात यासाठी मतदान होत आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे दोन्ही पदांसाठी याच अधिवेशनाच्या कालावधीत निवडणूक होत आहे.अधिवेशन वादळी ठरणार - या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त कामकाज व्हावे या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार 24 विधेयके सादर करण्याची शक्यता आहे. यातील काही विधेयकांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरतील अशी शक्यता आहे.

विरोधकांचा हल्लाबोल - मोदींनी विकास आणि सकारात्मकतेचे आवाहन केले असले तरी दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. महागाईच्या मुद्यावरुन प्रामुख्याने विरोधक सवाल करत आहेत. काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षातील प्रमुख खासदार यावेळी उपस्थित होते.

Last Updated : Jul 19, 2022, 11:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details