पाटणा (बिहार) : Nitish Kumar: बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू होऊनही ना अवैध दारूविक्री कमी झाली आहे ना नकली दारूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. छपरा येथे आतापर्यंत बनावट दारूमुळे ३६ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला Chhapra Spurious Liquor Case आहे. या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने सरकारला घेराव घालत असून, मुख्यमंत्री नितीश यांच्याकडून उत्तर मागितले जात आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेच्या कामकाजादरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली CM Nitish Kumar on Bihar Hooch Tragedy आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जो दारू पितो तो नक्कीच मरतो. मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये दारू बंदी आहे. लोकांनी त्याचा वापर करू नये. one consuming spurious liquor will die
'दारू पिणे वाईट आहे, जो पिईल तो मरेल': मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बनावट दारू पिणाऱ्याचा मृत्यू निश्चितच होतो, लोकांनी स्वतः सावध राहावे. ते म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये दारूबंदी नाही, तेथेही बनावट दारू पिल्याने मृत्यूचे प्रकार सुरूच आहेत. बिहारमध्ये दारूबंदी नसतानाही बनावट दारू पिऊन लोक मरायचे. लोकांनी सतर्क राहावे.