महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 21, 2020, 11:50 AM IST

ETV Bharat / bharat

राजस्थान: ट्रक आणि जीपच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

पल्लू परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर ट्रक आणि जीपमध्ये हा अपघात झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

rajasthan accident
राजस्थान अपघात

जयपूर - राज्यातील हनुमानगड जिल्ह्यात भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पल्लू परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर ट्रक आणि जीपमध्ये हा अपघात झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघातात जीप चक्काचूर झाली आहे. सत्संग कार्यक्रम आटापून घरी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. पुरबसर बस स्टॅडजवळ ही घटना घडली असून लेगा वाली ढाणी गावातील सर्वजण असल्याची माहीती मिळाली आहे.

काल(गुरुवारी) महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी सहापेक्षा अधिक अपघात घडले. या अपघातांमध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे देशभरात गुरुवार हा घातवारच ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. तर आज राजस्थानात सहा जणांचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details