नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेला लॉकडाऊन याचा विचार करता सरकारने सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, आवर्ती जमा (आरडी) धारकांना दिलासा दिला आहे. या योजनांसाठी भराव्या लागणाऱ्या रक्कमेचा कालावधी तीन महिने वाढवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली.
पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी खात्यामध्ये 2019-20 ची अनिर्वाय रक्कम भरण्याची मुदत आता 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.