हैदराबाद -कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणूला न घाबरता, लोकांनी सावध आणि सतर्क राहावे, असे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. अंदाजानुसार येत्या दोन ते तीन महिन्यांत देशात सकारात्मक घटनांमध्ये वाढ होऊ शकते, असेही ते म्हणाले.
लोकांनी कोरोनाबाबत कोणतीही भीती किंवा चिंता बाळगू नये. कितीही रुग्ण वाढले तरी उपचार करण्यास सरकार सज्ज आहे. आवश्यक पीपीई किट, चाचणी किट, मास्क, बेड, व्हेंटिलेटर, रुग्णालये सर्वच तयार आहे, असे राव म्हणाले. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोरोनामुळे जगभरात होणाऱ्या घडामोडींचे परीक्षण करणारे वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ आणि राज्यस्तरीय समित्यांनी मुख्यमंत्री व मंत्र्यांना सद्यस्थिती स्पष्ट केली.