रायपूर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर देशभरामध्ये लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये स्थलांतरीत कामगार, मजूर, पर्यटक अडकून पडले आहेत. छत्तीसगड राज्याने स्थलांतरीत कामगारांना माघारी आणण्यासाठी योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विविध राज्यामध्ये अडकलेल्या कामगारांना आढावा घेण्यात येत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार एक लााख मजूर २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यापासून अडकून पडले आहेत. स्थलांतरीत कामगार माघारी आणल्यानंतर त्यांच्या तपासणीची आणि विलगीकरणाची व्यवस्था करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव आर. पी. मंडल यांनी जिल्हाधीकाऱ्यांना दिले आहेत. परराज्यातून माघारी येणारे नागरिकांची माहीत जमा करण्याबाबतही मंडल यांनी सांगितले.