महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 27, 2019, 10:42 AM IST

ETV Bharat / bharat

'काश्मिरमधील दहशतवादाचे मूळ हे १९६० सालच्या घटनांमध्ये; मुफ्ती-अब्दुल्लांचे अस्तित्व आता संपले आहे'

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, हे जम्मू आणि काश्मिरमधील आपल्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिणार आहेत. तसेच, कलम ३७० हटवले जाऊन, दोन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार होण्याबाबतही यामध्ये ते लिहिणार आहेत. काश्मिरमधील दहशतवादाबाबत बोलताना ते म्हणाले, की याची मुळे ही १९६०च्या राजकीय घडामोडींमध्ये आहेत. खासकरून तत्कालीन नेत्यांच्या चुकांमध्ये.

Abdullahs, Muftis no more relevant in J&K: Ex-Governor Malik
'काश्मिरमधील दहशतवादाचे मूळ हे १९६० सालच्या घटनांमध्ये; मुफ्ती-अब्दुल्लांचे अस्तित्व आता संपले आहे'

पणजी -गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, हे जम्मू आणि काश्मिरमधील आपल्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिणार आहेत. तसेच, कलम ३७० हटवले जाऊन, दोन नवीन केंद्रशासित प्रदेश तयार होण्याबाबतही यामध्ये ते लिहिणार आहेत. ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ यादरम्यान ते दिल्लीचे राज्यपाल होते.

एका स्थानिक वाहिनीला याबाबत दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की जम्मू आणि काश्मिरमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये एकाही मौलवी, प्राध्यापक, अधिकारी वा राजकारण्याच्या मुलाचा मृत्यू झाला नाही. याचाच अर्थ परिस्थिती नियंत्रणात होती. ते पुढे म्हणाले, की फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती या नेत्यांच्या विचारांचे जम्मू आणि काश्मिरमध्ये अस्तित्व उरले नाही.

जम्मू आणि काश्मिरमध्ये परिस्थिती हळूहळू सामान्य होईल. बुधवारीच तेथून सात हजार जवानांना हटवण्यात आले. दुकाने हळूहळू उघडत आहेत, व्यापार सुरू होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

काश्मिरमधील दहशतवादाबाबत बोलताना ते म्हणाले, की याची मुळे ही १९६०च्या राजकीय घडामोडींमध्ये आहेत. खासकरून तत्कालीन नेत्यांच्या चुकांमध्ये. दिल्लीतीन नेत्यांची चूक ही होती, की त्यांनी फसव्या मार्गाने सरकार बदलले. एका निवडणुकीमध्ये सर्व फॉर्म हे रद्द करण्यात आले, आणि ठराविक उमेदवारांना जिंकवण्यात आले. अशा घटनांमध्येच दहशतवादाचे मूळ असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा : 'काँग्रेस, ओवेसी, तुकडे तुकडे गँग देशामध्ये गृहयुद्ध लावू इच्छिते'

ABOUT THE AUTHOR

...view details