ETV Bharat / state

केंद्र सरकारचा कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडण्याचा घाट ? सभापतींनी लिहले राज्यपालांना पत्र - Meeting of Chairmen of Market Committee in Yavatmal District

यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बाजार समितीच्या सभापतींनी, केंद्र सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडण्याचा घाट घालत असल्याची तक्रार करणारे पत्र राज्यपालांना लिहीले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समितीच्या सभापतींची बैठक
author img

By

Published : Nov 19, 2019, 3:12 PM IST

यवतमाळ - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्याच बरखास्त करण्याचे संकेत दिले. हा खरेतर शेतकऱ्यांनाच संपविण्याचा घाट असल्याची तक्रार बीड जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या सभापतींनी केली आहे. याविरोधात राज्यभर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा यावेळी या सभापतींनी दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याची तक्रार यवतमाळ जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या सभापतींनी केली...

हेही वाचा... माध्यमिक शालान्त परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; दहावी 3 मार्च, तर बारावीची 18 फेब्रुवारी पासून 'परीक्षा'

यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी एकत्र येत केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विरोध दर्शविला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र दिले गेले. देशभरातील बाजार समित्या बरखास्त करून ई-नाम प्रणालीचा उल्लेख करण्यात आला. ही प्रणाली बाजार समित्या कायम ठेवीत राबविता येते. मात्र केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत व्यापाऱ्यांनाच आधार दिला आहे, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.

हेही वाचा... शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक संपन्न; काय ठरले याबाबत उत्सुकता

या निर्णया विरोधात राज्यभर आंदोलन उभे केले जाणार आहे. केंद्र सरकारकडे निवेदन दिले जाणार आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, राळेगावचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, आर्णीचे सभापती राजू पाटील, उमरखेडचे सभापती बाळासाहेब चंद्रे, मारेगावचे सभापती नरेंद्र ठाकरे, नेरचे नरेंद्र राऊत, यवतमाळचे सभापती रवींद्र ढोक, नरेंद्र कोंबे, कापूस पणन महासंघ संचालक सुरेश चिंचोळकर उपस्थित होते.

यवतमाळ - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्याच बरखास्त करण्याचे संकेत दिले. हा खरेतर शेतकऱ्यांनाच संपविण्याचा घाट असल्याची तक्रार बीड जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या सभापतींनी केली आहे. याविरोधात राज्यभर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा यावेळी या सभापतींनी दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याची तक्रार यवतमाळ जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांच्या सभापतींनी केली...

हेही वाचा... माध्यमिक शालान्त परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; दहावी 3 मार्च, तर बारावीची 18 फेब्रुवारी पासून 'परीक्षा'

यवतमाळ जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी एकत्र येत केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात विरोध दर्शविला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र दिले गेले. देशभरातील बाजार समित्या बरखास्त करून ई-नाम प्रणालीचा उल्लेख करण्यात आला. ही प्रणाली बाजार समित्या कायम ठेवीत राबविता येते. मात्र केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत व्यापाऱ्यांनाच आधार दिला आहे, अशी तक्रार यावेळी करण्यात आली.

हेही वाचा... शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक संपन्न; काय ठरले याबाबत उत्सुकता

या निर्णया विरोधात राज्यभर आंदोलन उभे केले जाणार आहे. केंद्र सरकारकडे निवेदन दिले जाणार आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, राळेगावचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, आर्णीचे सभापती राजू पाटील, उमरखेडचे सभापती बाळासाहेब चंद्रे, मारेगावचे सभापती नरेंद्र ठाकरे, नेरचे नरेंद्र राऊत, यवतमाळचे सभापती रवींद्र ढोक, नरेंद्र कोंबे, कापूस पणन महासंघ संचालक सुरेश चिंचोळकर उपस्थित होते.

Intro:Body:यवतमाळ : बाजार समित्याच बरखास्त करण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. हा शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट आहे. याविरोधात राज्यभरात आंदोलनाचे पुकारले जाईल, असा इशारा जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी दिला आहे.
जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी एकत्र येत केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात विरोध दर्शविला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र दिले. देशभरातील बाजार समित्या बरखास्त करून ई-नाम पणालीचा उल्लेख करण्यात आला. ही प्रणाली बाजार समित्या कायम ठेवीत राबविता येते. मात्र केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत व्यापाऱ्यांनाच आधार दिला आहे.
व्यापाऱ्यांनी शेतमालाचे पैसे दिले नाही, काट्यात हेराफेरी केली, तर कोण जबाबदार राहणार अशा घटना घडल्या तर शेतकऱ्याना कोण वाचविणार असा प्रश्नही निर्माण होणार आहे. ही ई-नाम प्रणाली शेतकऱ्यांना हाताळता येईल काय? आदी प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारावर जावे लागेल. शेतकऱ्यांना लुटण्याची खुलेआम मुभा मिळणार आहे. याविरोधात राज्यभरात आंदोलन उभे केले जाणार आहे. केंद्र शासनाकडे निवेदन दिले जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी कळंब बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख, राळेगावचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, आर्णीचे सभापती राजू पाटील, उमरखेडचे सभापती बाळासाहेब चंद्रे, मारेगावचे सभापती नरेंद्र ठाकरे, नेरचे नरेंद्र राऊत, यवतमाळचे सभापती रवींद्र ढोक, नरेंद्र कोंबे, कापूस पणन महासंघ संचालक सुरेश चिंचोळकर उपस्थित होते.

बाईट -प्रवीण देशमुख, सभापती कळंब
बाईट -अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, सभापती राळेगावConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.