ठाणे - देशात दिवसेंदिवस कर्करोगाचे ( Cancer Increasing In India ) प्रमाण वाढत आहे. सरकारी पातळीवर याकरिता जनजागृती ( Awareness For Cancer ) होत आहे. असे असले तरी लोकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. आजच्या घडीला कर्करोग 30 ते 50 वर्ष वयाच्या ( Cancer Increasing In 30 to 50 Year Age Group People ) व्यक्तीत वाढत आहे. 16 वर्षांखालील वयोगटातील कर्करोगाचे प्रमाण 6 ते 8 टक्क्यांनी वाढलेले आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी जगतिक कर्करोग दिवस ( World Cancer Day ) म्हणून कर्करोग तज्ञ डॉ. अविनाश तळेले ( Dr. Avinash Talele ) यांचा वार्तालाप कार्यक्रम डोंबिवली पत्रकार संघाच्या माध्यमातून आयोजित केला होता. त्यावेळी कर्करोगतज्ञ डॉ. अविनाश तळेले यांनी कर्करोग आजाराचे रुग्ण 15 टक्क्यांनी वाढतील, अशी शक्यता वजा भीती वर्तवली आहे.
महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात स्तनांचा कर्करोग -
सध्याच्या जीवनपद्धतीत बदल झाला असून प्रदूषण, सकस आहार, राहणीमान, व्यायामाकडे दुर्लक्ष आणि व्यसन यामुळे कर्करोग प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात स्तनांचा कर्करोग दिसून येत असून गर्भाशयाचा कर्करोगाचे प्रमाण समोर येत आहे. डॉ. तळेले म्हणाले, कर्करोगाचे निदान सुरुवातीला झाले, तर उपचारही लवकर सुरु होऊ शकतात. मात्र, तसे न होता रुग्ण कर्करोग तिसऱ्या स्टेजपर्यंत गेल्यानंतर उपचारांसाठी डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. या उलट इतर देशात रुग्ण लवकर तपासणी करण्यासाठी येत असल्याने कर्करोगावर लवकर उपचार सुरु होतात. नागरिकांनी कर्करोगाबाबत जागरूकता दाखवली तर देशातील कर्करोग नियंत्रणात आणू शकतो.
लठ्ठपणा दूर ठेवण्यामुळे कर्करोग टाळू शकतो -