ETV Bharat / state

'एल्गार' ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही - अरुंधती राय - पुणे एल्गार परिषद

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या, एल्गार ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही, दंगली भडकावण्याचे काम आम्ही करत नाही, इतरांसारखे आम्ही एकमेकांना आपापसात लढायला लावत नाही, असे अरुंधती राय म्हणाल्या.

पुणे
पुणे
author img

By

Published : Jan 30, 2021, 10:02 PM IST

पुणे : कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी अटकेत असलेल्यांची मी चांगली सहकारी आहे, त्यांनी कोणती चूक केली आहे, असे मला वाटत नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही तरी हजारो पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले, कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणे हे भारतात खूप मोठे अवघड काम आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती राय यांनी केले आहे.

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या, एल्गार ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही, दंगली भडकावण्याचे काम आम्ही करत नाही, इतरांसारखे आम्ही एकमेकांना आपापसात लढायला लावत नाही, असे अरुंधती राय म्हणाल्या. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे तर सरकारने हा कायदा मागे घ्यायला हवा, असे राय म्हणाल्या. पेशवे गेले मात्र अजूनही पेशवाई गेली नाही, जातींवर निंयत्रण ठेवण्याचे काम ब्राह्मणवाद करतो. याच पुणे शहरात पुणे करार झाला तेव्हा आंबेडकरांना ब्लॅकमेल करून पुणे करार केला गेला, असे वक्तव्य देखील राय यांनी यावेळी केले.

परिषदेत दिवसभर विविध कार्यक्रम...

विषम जाती व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्यासाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी 31 डिसेंम्बर 2017 ला कोरेगाव भीमा शौर्य दिनाचे औचित्य साधून पुण्यातील शनिवरवाड्यावर एल्गार परिषद झाली होती, त्यानंतर तीन वर्षानंतर पुन्हा एकदा एल्गार परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली. 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कलाक्रीडा मंचमध्ये दिवसभर या परिषदेचे आयोजन करणयात आले होते. या परिषदेला प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती राय सहभागी झाल्या होत्या, तसेच पंजाबमधील शेत मजुरांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते बंत सिंग, जामियामधील विद्यार्थी नेता आयेशा रेन्ना, पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विविध वक्त्यांनी सध्याच्या राजकीय सत्तेवर कडाडून प्रहार केला. आपल्या पदाचा राजीनामा देणारे केरळमधील आयपीएस अधिकारी कन्नन गोपीनाथ हे देखील एल्गार परिषदेला उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी सध्याचे राज्यकर्ते आणि जनतेच्या मानसिकतेवर भाष्य केले. .

ये सरकार फॅसिस्ट बनना चाहते है, मगर है तो बेवकुफ, सरकारला प्रश्न विचारले तर तुम्ही तुकडे तुकडे गँग झालात आता आंदोलक शेतकऱ्यांना देखील अशाच प्रकारे बदनाम केले जातेय व अशी जोरदार टीका कन्नन यांनी केली. भारतीय राजकारणात चाणक्याची गरज काय, राजे राजवाडेच्या काळात प्रजेवर नियंत्रण करण्यासाठी चाणक्याची गरज होती, आता लोकशाही आहे, आपण नागरीक आहोत अशा चाणक्याची गरज नाही, असे सांगत देशात एक मोदी नाही ठिकठिकाणी मोदी आहेत. आम्ही प्रश्न विचारायला घाबरतो, आम्ही नागरिक म्हणून वागत नाही. आपल्या हक्कासाठी लढत नाही आज प्रजा म्हणूनच आपण वागतो. आपल्याला बोलण्याची आझादी हवी. प्रजेपासून नागरिक बनण्याचा प्रवास या देशासाठी आवश्यक आहे, असे कन्नन गोपीनाथन म्हणाले.

अनेकांची जातीव्यवस्थेवर टीका

यंदाच्या या एल्गार परिषदेत विविध वक्त्यांनी मते मांडली. सध्याचे सत्ताधारी हे भगवे दहशतवादी आहेत, असा घणाघात विद्यार्थी नेता आयेशा रेन्ना यांनी केला, विद्यापीठातील ब्राह्मणवादी व्यवस्थेचा दलित बहुजन आणि मुस्लीम बळी ठरत असल्याचे वक्तव्य केले, तसेच केंद्र सरकार आणि आरएसएसवर टीका केली. तर माजी पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात विषमतावादी ब्राह्मणवादी व्यवस्थेविरोधात आमचा हा एल्गार आहे, असे सांगत ब्राह्मणवादी व्यवस्थेविरोधात वर्षानुवर्षापासून आंदोलन विरोध सुरू आहेत. पण, ब्राह्मणवादी त्याला गंभीरपणे घेत नव्हते, मात्र 2017 ला झालेल्या एल्गार परिषदेने यांची झोप उडाली आणि त्यामुळेच आयबीने या प्रकरणात कारवाई केली, असे मत निवृत्त पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. आयबीवर पूर्णपणे ब्राह्मणवाद्यांचे वर्चस्व आहे, त्यांनी एल्गार परिषदेतील काही वक्तव्य, घोषणांवरून गुन्हे दाखल करण्यात आले, असे मुश्रीफ म्हणाले.

यंदाच्या वर्षापासून एल्गार पुरस्कार देण्यास

एमडीचे शिक्षण घेत असताना रॅगिंगची बळी ठरलेली पायल तडवी यांच्या आई आबिदा तडवीदेखील एल्गार परिषदेत सहभागी झाल्या होत्या. पायल अनेक स्वप्न घेऊन मुंबईत आली होती, आमच्या आदिवासी समाजातील पहिली एमडी डॉक्टर ती झाली असती, मात्र मनुवादी समाजव्यवस्थेची ती बळी ठरली अशी वेदना नायर रुग्णालयात एमडीसाठी प्रवेश घेतलेल्या आणि तिथल्या रॅगिंगला बळी ठरलेल्या पायल तडवीची आई आबिदा तडवी यांनी व्यक्त केली. ही एल्गार परिषद सहा सत्रात घेण्यात आली, विविध वक्त्यांच्या भाषणासोबत समता कला मंच, कबीर कला मंच, पराई हा तामिळनाडूतील सांस्कृतिक कला ग्रुप देखील सहभागी झाला होता. यंदाच्या वर्षापासून एल्गार पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून यावर्षी सामाजिक कार्यकर्ते किशोर कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुणे : कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी अटकेत असलेल्यांची मी चांगली सहकारी आहे, त्यांनी कोणती चूक केली आहे, असे मला वाटत नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही तरी हजारो पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले, कायद्यावर आधारीत न्यायव्यवस्था आणणे हे भारतात खूप मोठे अवघड काम आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती राय यांनी केले आहे.

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या, एल्गार ही बेकायदेशीर नाही, संविधानविरोधी काम करणारी नाही, दंगली भडकावण्याचे काम आम्ही करत नाही, इतरांसारखे आम्ही एकमेकांना आपापसात लढायला लावत नाही, असे अरुंधती राय म्हणाल्या. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे तर सरकारने हा कायदा मागे घ्यायला हवा, असे राय म्हणाल्या. पेशवे गेले मात्र अजूनही पेशवाई गेली नाही, जातींवर निंयत्रण ठेवण्याचे काम ब्राह्मणवाद करतो. याच पुणे शहरात पुणे करार झाला तेव्हा आंबेडकरांना ब्लॅकमेल करून पुणे करार केला गेला, असे वक्तव्य देखील राय यांनी यावेळी केले.

परिषदेत दिवसभर विविध कार्यक्रम...

विषम जाती व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्यासाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी 31 डिसेंम्बर 2017 ला कोरेगाव भीमा शौर्य दिनाचे औचित्य साधून पुण्यातील शनिवरवाड्यावर एल्गार परिषद झाली होती, त्यानंतर तीन वर्षानंतर पुन्हा एकदा एल्गार परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली. 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कलाक्रीडा मंचमध्ये दिवसभर या परिषदेचे आयोजन करणयात आले होते. या परिषदेला प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती राय सहभागी झाल्या होत्या, तसेच पंजाबमधील शेत मजुरांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते बंत सिंग, जामियामधील विद्यार्थी नेता आयेशा रेन्ना, पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विविध वक्त्यांनी सध्याच्या राजकीय सत्तेवर कडाडून प्रहार केला. आपल्या पदाचा राजीनामा देणारे केरळमधील आयपीएस अधिकारी कन्नन गोपीनाथ हे देखील एल्गार परिषदेला उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी सध्याचे राज्यकर्ते आणि जनतेच्या मानसिकतेवर भाष्य केले. .

ये सरकार फॅसिस्ट बनना चाहते है, मगर है तो बेवकुफ, सरकारला प्रश्न विचारले तर तुम्ही तुकडे तुकडे गँग झालात आता आंदोलक शेतकऱ्यांना देखील अशाच प्रकारे बदनाम केले जातेय व अशी जोरदार टीका कन्नन यांनी केली. भारतीय राजकारणात चाणक्याची गरज काय, राजे राजवाडेच्या काळात प्रजेवर नियंत्रण करण्यासाठी चाणक्याची गरज होती, आता लोकशाही आहे, आपण नागरीक आहोत अशा चाणक्याची गरज नाही, असे सांगत देशात एक मोदी नाही ठिकठिकाणी मोदी आहेत. आम्ही प्रश्न विचारायला घाबरतो, आम्ही नागरिक म्हणून वागत नाही. आपल्या हक्कासाठी लढत नाही आज प्रजा म्हणूनच आपण वागतो. आपल्याला बोलण्याची आझादी हवी. प्रजेपासून नागरिक बनण्याचा प्रवास या देशासाठी आवश्यक आहे, असे कन्नन गोपीनाथन म्हणाले.

अनेकांची जातीव्यवस्थेवर टीका

यंदाच्या या एल्गार परिषदेत विविध वक्त्यांनी मते मांडली. सध्याचे सत्ताधारी हे भगवे दहशतवादी आहेत, असा घणाघात विद्यार्थी नेता आयेशा रेन्ना यांनी केला, विद्यापीठातील ब्राह्मणवादी व्यवस्थेचा दलित बहुजन आणि मुस्लीम बळी ठरत असल्याचे वक्तव्य केले, तसेच केंद्र सरकार आणि आरएसएसवर टीका केली. तर माजी पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात विषमतावादी ब्राह्मणवादी व्यवस्थेविरोधात आमचा हा एल्गार आहे, असे सांगत ब्राह्मणवादी व्यवस्थेविरोधात वर्षानुवर्षापासून आंदोलन विरोध सुरू आहेत. पण, ब्राह्मणवादी त्याला गंभीरपणे घेत नव्हते, मात्र 2017 ला झालेल्या एल्गार परिषदेने यांची झोप उडाली आणि त्यामुळेच आयबीने या प्रकरणात कारवाई केली, असे मत निवृत्त पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. आयबीवर पूर्णपणे ब्राह्मणवाद्यांचे वर्चस्व आहे, त्यांनी एल्गार परिषदेतील काही वक्तव्य, घोषणांवरून गुन्हे दाखल करण्यात आले, असे मुश्रीफ म्हणाले.

यंदाच्या वर्षापासून एल्गार पुरस्कार देण्यास

एमडीचे शिक्षण घेत असताना रॅगिंगची बळी ठरलेली पायल तडवी यांच्या आई आबिदा तडवीदेखील एल्गार परिषदेत सहभागी झाल्या होत्या. पायल अनेक स्वप्न घेऊन मुंबईत आली होती, आमच्या आदिवासी समाजातील पहिली एमडी डॉक्टर ती झाली असती, मात्र मनुवादी समाजव्यवस्थेची ती बळी ठरली अशी वेदना नायर रुग्णालयात एमडीसाठी प्रवेश घेतलेल्या आणि तिथल्या रॅगिंगला बळी ठरलेल्या पायल तडवीची आई आबिदा तडवी यांनी व्यक्त केली. ही एल्गार परिषद सहा सत्रात घेण्यात आली, विविध वक्त्यांच्या भाषणासोबत समता कला मंच, कबीर कला मंच, पराई हा तामिळनाडूतील सांस्कृतिक कला ग्रुप देखील सहभागी झाला होता. यंदाच्या वर्षापासून एल्गार पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून यावर्षी सामाजिक कार्यकर्ते किशोर कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.