ETV Bharat / state
खेळाडू वृत्तीमुळे पराभव पचविण्याचे सामर्थ्य येते - कुलगुरू डॉ.अशोक ढवण - defeat
क्रीडा आणि कलेला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांमधील या गुणांचे सवर्धन झाले पाहिजे. तसेच विद्यार्थी दशेत सर्वांनी कला व क्रीडा प्रकारात सहभाग घेतलाच पाहिजे. यामुळे आपल्यातील उपजत गुणांना वाव मिळतो. व व्यक्तीमधील खेळाडू वृत्तीचा विकास होतो, यामुळे पुढील जीवनात पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
![खेळाडू वृत्तीमुळे पराभव पचविण्याचे सामर्थ्य येते - कुलगुरू डॉ.अशोक ढवण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4165581-173-4165581-1566077996935.jpg?imwidth=3840)
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना कुलगुरु डॉ. अशोक ढवण
By
Published : Aug 18, 2019, 4:24 AM IST
परभणी - क्रीडा आणि कलेला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमधील या गुणांचे सवर्धन झाले पाहिजे. तसेच विद्यार्थी दशेत सर्वांनी कला व क्रीडा प्रकारात सहभाग घेतलाच पाहिजे. यामुळे आपल्यातील उपजत गुणांना वाव मिळतो. व व्यक्तीमधील खेळाडू वृत्तीचा विकास होतो, यामुळे पुढील जीवनात पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील क्रीडा व कला क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक एन.एस.राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ.अशोक कडाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तोकडे मनुष्यबळ असतानाही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर कला व सांस्कृतिक क्षेत्रात घवघवीत यश मिळविले आहे. विद्यापीठास लौकिक मिळवून दिला, ही अभिमानाची बाब आहे. आज इतर राज्यातील अनेक विद्यार्थ्यी विद्यापीठात प्रवेश घेत आहेत. त्यांना विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली असते. त्यांच्यासोबत या सांस्कृतिक वारसाचे देवाणघेवाण झाल्यास मराठवाडा व राज्यातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास हातभार लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
तर शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले यांनी यशस्वी खेळाडुंच्या गुणगौरवामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात मयुरी निळख, रोहित वेताळ, हर्षल गाडे, शुभम गोंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2018-19 या वर्षात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध युवक महोत्सव, क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या संघाचे व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.महेश देशमुख यांनी विद्यापीठाच्या कला व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.आशा देशमुख व अशोक खिल्लारे यांनी केले, तर आभार प्रा.डी.एफ.राठोड यांनी मानले.
दरम्यान, गुजरातमधील दंतेवाडा येथील सरदार कृषिनगर विद्यापीठात पार पाडलेल्या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठीय युवक महोत्सवात विद्यापीठाला उपविजेतेपद मिळाले. या युवक महोत्सवात एकांकिका व प्रहसन स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रांगोळी कला प्रकारात सुवर्ण चषक प्राप्त केलेला कृष्णा अनारसे, कोलाजमध्ये रौप्य चषक प्राप्त केलेला ऋषीकेश नवरकर तर वादविवाद स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खुशी सातोनकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात क्रीडा प्राध्यापक व मार्गदर्शक डॉ.रवी काळे, डॉ.आशा देशमुख, प्रा.डी.एफ.राठोड, डॉ.पी.एच. गौरखेडे, प्रा.भालचंद्र पवार, विजय सावंत, प्रा ए क्यु खाजा, रंगोली पडघन यांचाही सत्कार करण्यात आला.
परभणी - क्रीडा आणि कलेला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमधील या गुणांचे सवर्धन झाले पाहिजे. तसेच विद्यार्थी दशेत सर्वांनी कला व क्रीडा प्रकारात सहभाग घेतलाच पाहिजे. यामुळे आपल्यातील उपजत गुणांना वाव मिळतो. व व्यक्तीमधील खेळाडू वृत्तीचा विकास होतो, यामुळे पुढील जीवनात पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील क्रीडा व कला क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक एन.एस.राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ.अशोक कडाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तोकडे मनुष्यबळ असतानाही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर कला व सांस्कृतिक क्षेत्रात घवघवीत यश मिळविले आहे. विद्यापीठास लौकिक मिळवून दिला, ही अभिमानाची बाब आहे. आज इतर राज्यातील अनेक विद्यार्थ्यी विद्यापीठात प्रवेश घेत आहेत. त्यांना विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली असते. त्यांच्यासोबत या सांस्कृतिक वारसाचे देवाणघेवाण झाल्यास मराठवाडा व राज्यातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास हातभार लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
तर शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले यांनी यशस्वी खेळाडुंच्या गुणगौरवामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात मयुरी निळख, रोहित वेताळ, हर्षल गाडे, शुभम गोंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2018-19 या वर्षात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध युवक महोत्सव, क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या संघाचे व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.महेश देशमुख यांनी विद्यापीठाच्या कला व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.आशा देशमुख व अशोक खिल्लारे यांनी केले, तर आभार प्रा.डी.एफ.राठोड यांनी मानले.
दरम्यान, गुजरातमधील दंतेवाडा येथील सरदार कृषिनगर विद्यापीठात पार पाडलेल्या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठीय युवक महोत्सवात विद्यापीठाला उपविजेतेपद मिळाले. या युवक महोत्सवात एकांकिका व प्रहसन स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रांगोळी कला प्रकारात सुवर्ण चषक प्राप्त केलेला कृष्णा अनारसे, कोलाजमध्ये रौप्य चषक प्राप्त केलेला ऋषीकेश नवरकर तर वादविवाद स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खुशी सातोनकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात क्रीडा प्राध्यापक व मार्गदर्शक डॉ.रवी काळे, डॉ.आशा देशमुख, प्रा.डी.एफ.राठोड, डॉ.पी.एच. गौरखेडे, प्रा.भालचंद्र पवार, विजय सावंत, प्रा ए क्यु खाजा, रंगोली पडघन यांचाही सत्कार करण्यात आला.
Intro:परभणी - क्रीडा आणि कलेला विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांमधील या गुणांचे सवर्धन झालेच पाहिजे. विद्यार्थी दशेत सर्वांनी कला व क्रीडा प्रकारात सहभाग घेतलाचा पाहिजे. यामुळे आपल्यातील उपजत गुणांना वाव मिळतो, व्यक्तीमधील खेळाडु वृत्तीचा विकास होतो, यामुळे पुढील जीवनात पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.Body:परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील क्रीडा व कला क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यीच्या गुणगौरव सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक एन.एस.राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ.अशोक कडाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू ढवण पुढे म्हणाले की, तोडके मनुष्यबळ असतांनाही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर कला व सांस्कृतिक क्षेत्रात घवघवीत यश मिळविले आहे, विद्यापीठास लौकिक मिळवुन दिला, ही अभिमानाची बाब आहे. आज इतर राज्यातील अनेक विद्यार्थ्यी विद्यापीठात प्रवेश घेत आहेत, त्यांना विविध सांस्कृतिक पार्श्वभुमी लाभलेली असते, त्यांच्या सोबत या सांस्कृतीक वारसाचे देवाणघेवाण झाल्यास मराठवाडा व राज्यातील विद्यार्थ्यीच्या व्यक्तीमत्व विकासास हातभार लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले यांनी यशस्वी खेळाडुचे गुणगौरवामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले. तर कार्यक्रमात मयुरी निळख, रोहित वेताळ, हर्षल गाडे, शुभम गोंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2018-19 या वर्षात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध युवक महोत्सव, क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या संघाचे व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.महेश देशमुख यांनी विद्यापीठाच्या कला व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.आशा देशमुख व अशोक खिल्लारे यांनी केले, तर आभार प्रा.डी.एफ.राठोड यांनी मानले.
दरम्यान, गुजरातमधील दंतेवाडा येथील सरदार कृषिनगर विद्यापीठात पार पाडलेल्या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठीय युवक महोत्सवात विद्यापीठाला उपविजेतेपद मिळाले. या युवक महोत्सवात एकांकिका व प्रहसन स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केलेल्या ऋतुजा भालेराव, मयुरी निळख, समीक्षा वानखेडे, शिवानी येंगडे, हर्षल गाडे, संदीप गव्हाणे, ऋषीकेश नवरकर, अमन पवार, रोहित वेताळ, खुशी सातोनकर आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच लोकनृत्यात रौप्य पदकप्राप्त अनामिका अंभोरे, मयुरी निळख, आरती पांडे, समीक्षा वानखेडे, शिवानी येंगडे, स्वप्नाली माळशे, समीक्षा मोरे, वैष्णवी रणबावळे, प्रीती लावुदिया, शिवानी शिंदे, शुक्ला वैद्येही आदींचा गौरव करण्यात आला. रांगोळी कला प्रकारात सुवर्ण चषक प्राप्त केलेला कृष्णा अनारसे, कोलाज मध्ये रौप्य चषक प्राप्त केलेला ऋषीकेश नवरकर तर वादविवाद स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खुशी सातोनकर यांचा सत्कार करण्यात आला.
लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठात पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत 'वनामकृवि' च्या संघाने मुलांच्या कबड्डी व मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्ण चषक प्राप्त केले. कबडडी संघातील प्रतीक घाडगे, प्रतीक थोरात, मोहन गंडरे, स्वप्नील सातारकर, वैभव डुकरे, शुभम पिंगळे, हरिकृष्णा माधुरी, अक्षय नापते, दादासाहेब ठोंबरे, सुशांत औताडे आदींचा मान्सवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर व्हॉलीबॉल संघातील प्राजक्ता चौगुले, जयश्री भालेराव, दिक्षा नारळे, आश्विनी वरपे, रजनी टकले, प्रतीक्षा पवार, शितल पतंगे, महानंदा माने, विशाखा चोपडे, पल्लवी वाळवी आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत यश प्राप्त केलेला राम अरविंद याचाही गौरव करण्यात आला. तसेच पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या पश्चिम विभागीय युवक महोत्सव व चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात पार पडलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय युवक महोत्सवात रांगोळी स्पर्धेत स्वप्नजा कोठारे हिने अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक प्राप्त केला, त्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या शिवाय नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पार पडलेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवात कोलाज कला प्रकारात यश प्राप्त केलेल्या ऋषीकेश नवरकर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलेले शुभम गोंद्रे, अमोल राठोड, अमन पवार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रमाणेच नेपाळ येथे एशियन ड्रॉप रोबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या तुषार शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचे एकात्मता शिबीरातील युवक महोत्सवात प्रथम पारितोषिक पटकावलेल्या संघातील कोमल कदम, अश्विनी गायकवाड, कोमल धुर्वे, प्रज्योती काळे, किरण घुगे, भारत वाडेकर, शंतनु पाटील, प्रविण कांबळे, कल्पेश गायकवाड, अभिषेक मरकंदे यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात क्रीडा प्राध्यापक व मार्गदर्शक डॉ.रवि काळे, डॉ.आशा देशमुख, प्रा.डी.एफ.राठोड, डॉ.पी.एच. गौरखेडे, प्रा.भालचंद्र पवार, विजय सावंत, प्रा ए क्यु खाजा, रंगोली पडघन यांचाही सत्कार करण्यात आला, तसेच अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पार पडलेल्या कर्मचारी क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खेळाडुंचा देखील सत्कार करण्यात आला.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- 2 फोटो आहेत.
Conclusion: