ETV Bharat / state

बैल चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांने कुटुंबीयांना तिफनीला जुंपत केली पेरणी, पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप - nandurbar

माणिक पाटील यांनी उन्हाळ्यात गावात पाणी टंचाई असल्यामुळे शेतात बैलांची व्यवस्था केली होती. मात्र, १० एप्रिल २०१९ रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बैल चोरुन नेले. याबाबत त्यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण पोलीस प्रशासनाने पाटील यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप पाटील यांनी केला.

कुटंबीयांना नांगराला जुंपून पेरणी करताना शेतकरी
author img

By

Published : Jul 9, 2019, 6:07 PM IST

Updated : Jul 10, 2019, 7:45 AM IST

नंदुरबार - शेतातून १ लाख रुपये किंमतीच्या बैलांची चोरी झाल्यानंतर माणिक पाटील या शेतकऱ्यांने याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. मात्र, पोलिसांनी याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबीयांना तिफनीला जुंपत पेरणीला सुरुवात केली आहे.

कुटंबीयांना नांगराला जुंपून पेरणी करताना शेतकरी

नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावात रनाळे शिवारात पाटील यांची शेती आहे. उन्हाळ्यात गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्यांनी शेतातच बैलांची व्यवस्था केली होती. मात्र, १० एप्रिल २०१९ रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बैल चोरुन नेले. याबाबत त्यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण पोलीस प्रशासनाने पाटील यांच्या तक्रारीकडे पूर्णता दुर्लक्ष केले, असा आरोप पाटील यांनी केला.

बैल चोरीच्या एका महिन्यानंतर पाटील यांचा सालदार गिरधर कोळी हा संध्याकाळी शेजारील शेतातून वांगी आणि केऱ्या चोरताना आढळून आला. त्यावेळी त्याला चोरीचा जाब विचारला असता त्याने बैल चोरीची कबुली दिली. आसाने गावचे प्रकाश पाटील आणि त्यांचे मेहुणे संजय तुकाराम (रा. वरखेडी, ता- पाचोरा, जि- जळगाव) यांनी संगनमताने सालदाराला दारू पाजून १५ हजार रुपयांचे आमिष दाखवून बैल चोरुन नेल्याचे सांगितले.

शेतकरी माणिक पाटील यांनी सालदार याच्या सांगण्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी अजून पर्यंत कोणताही तपास सुरू केलेला नाही. पावसाळा सुरू झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. पण माणिक पाटील यांच्याकडे बैल नसल्यामुळे तसेच चोरीला गेलेला बैलांचा शोध पोलीस घेत नसल्याने हतबल झालेल्या माणिक पाटील यांनी पेरणी करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबीयांसोबत तिफन ओढत पेरणीला सुरुवात केली आहे.

नंदुरबार - शेतातून १ लाख रुपये किंमतीच्या बैलांची चोरी झाल्यानंतर माणिक पाटील या शेतकऱ्यांने याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. मात्र, पोलिसांनी याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबीयांना तिफनीला जुंपत पेरणीला सुरुवात केली आहे.

कुटंबीयांना नांगराला जुंपून पेरणी करताना शेतकरी

नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावात रनाळे शिवारात पाटील यांची शेती आहे. उन्हाळ्यात गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्यांनी शेतातच बैलांची व्यवस्था केली होती. मात्र, १० एप्रिल २०१९ रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बैल चोरुन नेले. याबाबत त्यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण पोलीस प्रशासनाने पाटील यांच्या तक्रारीकडे पूर्णता दुर्लक्ष केले, असा आरोप पाटील यांनी केला.

बैल चोरीच्या एका महिन्यानंतर पाटील यांचा सालदार गिरधर कोळी हा संध्याकाळी शेजारील शेतातून वांगी आणि केऱ्या चोरताना आढळून आला. त्यावेळी त्याला चोरीचा जाब विचारला असता त्याने बैल चोरीची कबुली दिली. आसाने गावचे प्रकाश पाटील आणि त्यांचे मेहुणे संजय तुकाराम (रा. वरखेडी, ता- पाचोरा, जि- जळगाव) यांनी संगनमताने सालदाराला दारू पाजून १५ हजार रुपयांचे आमिष दाखवून बैल चोरुन नेल्याचे सांगितले.

शेतकरी माणिक पाटील यांनी सालदार याच्या सांगण्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी अजून पर्यंत कोणताही तपास सुरू केलेला नाही. पावसाळा सुरू झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. पण माणिक पाटील यांच्याकडे बैल नसल्यामुळे तसेच चोरीला गेलेला बैलांचा शोध पोलीस घेत नसल्याने हतबल झालेल्या माणिक पाटील यांनी पेरणी करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबीयांसोबत तिफन ओढत पेरणीला सुरुवात केली आहे.

Intro:नंदुरबार, नंदुरबार तालुक्यातील माणिक पाटील शेतकऱ्यांच्या शेतातून एक लाख किंमतीच्या बैलांची चोरी झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे कुटुंबीयांना नांगराला जुंपत पेरणीला केली सुरुवात...Body:Anchor :- नंदुरबार तालुक्यातील माणिक पाटील शेतकऱ्यांच्या शेतातून एक लाख किंमतीच्या बैलांची चोरी झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे कुटुंबीयांना नांगराला जुंपत पेरणीला केली सुरुवात...

Vo 1 आसाणे गावचे शेतकरी माणिक पाटील यांची रनाळे शिवारात 150 गट नंबर ची शेती आहे उन्हाळ्यात गावात पाणी टंचाई असल्याने शेतात बैलांची व्यवस्था केली परंतु दहा एप्रिल 2019 रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्री बैल चोरून नेले याबाबत सविस्तर तक्रार नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनला त्यांनी केली, पोलीस प्रशासनाने माणिक पाटील यांच्या तक्रारीकडे पूर्णता दुर्लक्ष केलं आहे.

Byte :- माणिक पाटील - शेतकरी

एका महिन्यानंतर माणिक पाटील यांचा सालदार गिरधर कोळी हा संध्याकाळी शेजारील शेतातून वांगी आणि केऱ्या चोरताना आढळून आला त्यावेळी त्याला चोरीचा जाब विचारला असता त्याने बैल चोरी चाही कबुली नामा दिला. आसाने गावचे प्रकाश पाटील व त्यांचे मेहुणे संजय तुकाराम रा. वरखेडी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांनी संगनमताने सालदाराला दारू पाजुन 15 हजार रुपयांचे आमिष दाखवून बैल चोरुन नेल्याचा कबुली नामा सालदार गिरधर कोळी यांनी दिला आहे.

Byte :- गिरधर कोळी - सालदार

शेतकरी माणिक पाटील यांनी सालदार याच्या सांगण्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला परंतु पोलिस प्रशासनाने अजून पर्यंत कोणताही तपास सुरू केलेला नाही. पावसाळा सुरू झाल्याने शेती कामांना वेग आला आहे परंतु माणिक पाटील या शेतकऱ्यांकडे बैल नसल्यामुळे तसेच चोरीला गेलेला बैलांचा शोध पोलीस घेत नसल्याने हतबल झालेल्या माणिक पाटील यांनी पेरणी करण्यासाठी स्वतः कुटुंबीयांसोबत नांगर ओढत पेरणीला सुरुवात केली आहे.

Byte :- माणिक पाटील यांच्या पत्नी
Byte :- माणिक पाटील - शेतकरीConclusion:End vo दुष्काळी परिस्थितीत अडकलेला शेतकरी आणि चोरीला गेलेल्या बैलांचा तपास पोलिस प्रशासनाकडून होत नसल्याने मदत कोणाकडे मागावी न्याय कोण मिळवून देईल तेच माणिक पाटील या शेतकऱ्यांला कळेनासं झालं आहे.

P2c
Last Updated : Jul 10, 2019, 7:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.