मुंबई - गेल्या अनेक काळापासून मुलुंड मतदार संघात आमदार असलेले सरदार तारासिंग यांना डावलून कोट्यधीश असलेले मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून मुलुंड हा विभाग भाजपचा सर्वात सुरक्षित विभाग आहे. मात्र, यावेळी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला धक्का देण्याची रणनीती आखली आहे.
हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; 32 लाखांचे होते बक्षीस
ईशान्य मुंबईतील मुलुंड विधानसभा हा भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. मात्र, यावेळी सरदार तारासिंह यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. मुलुंड मतदारसंघात अनेक काम प्रलंबित आहेत. त्यामुळे 'आता बस झालं कमळ' ही टॅग लाईन सध्या मुलुंडमध्ये वायरल होत आहे. यामुळे भाजपला मुलुंडमध्ये तरी पेपर सोप्पा जाणार नाही, हे मात्र नक्की झाले आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचे शक्तिप्रदर्शन करत नामांकन दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात असल्यामुळे यंदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद रंगू शकतो. याची सुरूवात ही भाजपने केली होती. कोणत्याही चर्चेत नसलेले मिहीर कोटेचा यांना भाजपने या मतदारसंघात उमेदवारीत सर्वात पुढे असलेले नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना मराठी असल्याचे कारणाने डावलले, अशी चर्चा या भागात आहे. तर मुंबई विधानसभा भागात कोणताही भाषेचा वाद नाही. मी भारतीय असून भाषेचे राजकारण करत नाही. मी विकासाचे राजकारण करत आहे असे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.