ETV Bharat / state

आयुक्तांसमोर रडणाऱ्या शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले ड्रामेबाज! - सुनील केंद्रेकर मूळगाव दौरा

आयुक्त आपल्या मूळगावी येणार असल्याने, मोठ्या संख्येने शेतकरी त्यांच्या प्रतीक्षेत थांबले होते. आयुक्त आल्यानंतर पतंगे यांनी खराब झालेले सोयाबीन घेऊन आयुक्तांसमोर धाव घेतली. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पतंगे यांना ड्रामेबाज म्हणत त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या.

आयुक्त सुनील केंद्रेकर
author img

By

Published : Nov 19, 2019, 6:20 PM IST

हिंगोली - जिल्हा दौऱ्यावर असलेले आयुक्त सुनील केंद्रेकरांनी त्यांच्या मूळगावी (केंद्रा बुद्रुक) भेट दिली. आयुक्तांना खराब झालेले सोयाबीन दाखवताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मात्र, आयुक्तांसमोरच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शेतकऱ्याच्या अश्रूंना नाटकी म्हणत, शेतकऱ्याला ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या. खुद्द आयुक्तांच्या गावातच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची खिल्ली उडवल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

आयुक्तांच्या मूळगावी शेतकऱ्यांची खिल्ली


नामदेव पतंगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आयुक्त आपल्या मूळगावी येणार असल्याने, मोठ्या संख्येने शेतकरी त्यांच्या प्रतीक्षेत थांबले होते. आयुक्त आल्यानंतर पतंगे यांनी खराब झालेले सोयाबीन घेऊन आयुक्तांसमोर धाव घेतली. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पतंगे यांना ड्रामेबाज म्हणत त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या.

हेही वाचा - महाराष्ट्र सत्ता पेच : काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; दोन-तीन दिवसात होणार अंतिम निर्णय

यानंतर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना शांत करत त्या शेतकऱ्याला समोर बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. विमा कंपनी पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार पतंगे आणि इतर शेतकऱ्यांनी केली. याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे आयुक्त केंद्रे यांनी सांगितले.

हेही वाचा - केंद्र सरकारचा कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडण्याचा घाट ? सभापतींनी लिहले राज्यपालांना पत्र

मात्र, आयुक्तांसमोर शेतकऱ्यांचे अश्रू जिल्हाधिकाऱ्यांना नाटकी वाटल्यामुळे खळबळ उडाली आहे. घडलेल्या प्रकाराचा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा शेतकरी वर्गातून निषेध व्यक्त केला जात आहे.

केंद्रा गावाचा होणार कायापालट -
मूळगाव असलेल्या केंद्रा गावात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना दिल्या. गावातील विविध समस्यांचा आराखडा तयार करण्यासही अधिकाऱ्यांना सुनावले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरजीएस) जास्तीत जास्त विहिरींची निर्मिती करण्यात यावी. शालेय शिक्षकांची भरती, शेतकरी कर्ज याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याने केंद्रा गावाचा कायापालट होण्याची आशा गावकऱ्यांना आहे.

हिंगोली - जिल्हा दौऱ्यावर असलेले आयुक्त सुनील केंद्रेकरांनी त्यांच्या मूळगावी (केंद्रा बुद्रुक) भेट दिली. आयुक्तांना खराब झालेले सोयाबीन दाखवताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मात्र, आयुक्तांसमोरच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शेतकऱ्याच्या अश्रूंना नाटकी म्हणत, शेतकऱ्याला ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या. खुद्द आयुक्तांच्या गावातच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची खिल्ली उडवल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

आयुक्तांच्या मूळगावी शेतकऱ्यांची खिल्ली


नामदेव पतंगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आयुक्त आपल्या मूळगावी येणार असल्याने, मोठ्या संख्येने शेतकरी त्यांच्या प्रतीक्षेत थांबले होते. आयुक्त आल्यानंतर पतंगे यांनी खराब झालेले सोयाबीन घेऊन आयुक्तांसमोर धाव घेतली. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पतंगे यांना ड्रामेबाज म्हणत त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या.

हेही वाचा - महाराष्ट्र सत्ता पेच : काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; दोन-तीन दिवसात होणार अंतिम निर्णय

यानंतर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना शांत करत त्या शेतकऱ्याला समोर बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. विमा कंपनी पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची तक्रार पतंगे आणि इतर शेतकऱ्यांनी केली. याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे आयुक्त केंद्रे यांनी सांगितले.

हेही वाचा - केंद्र सरकारचा कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडण्याचा घाट ? सभापतींनी लिहले राज्यपालांना पत्र

मात्र, आयुक्तांसमोर शेतकऱ्यांचे अश्रू जिल्हाधिकाऱ्यांना नाटकी वाटल्यामुळे खळबळ उडाली आहे. घडलेल्या प्रकाराचा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा शेतकरी वर्गातून निषेध व्यक्त केला जात आहे.

केंद्रा गावाचा होणार कायापालट -
मूळगाव असलेल्या केंद्रा गावात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सूचना दिल्या. गावातील विविध समस्यांचा आराखडा तयार करण्यासही अधिकाऱ्यांना सुनावले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (एमआरजीएस) जास्तीत जास्त विहिरींची निर्मिती करण्यात यावी. शालेय शिक्षकांची भरती, शेतकरी कर्ज याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याने केंद्रा गावाचा कायापालट होण्याची आशा गावकऱ्यांना आहे.

Intro:
हिंगोली- जिल्हा दोऱ्यावर आलेले आयुक्त सुनील केंद्रेकर हे त्यांच्या मूळगावी केंद्रा बु. येथे आले असता, एका शेतकऱ्यांनी त्यांना सडके सोयाबीन दाखवत डोळ्यात अश्रू दाटून आले होते. मात्र आयुक्ता समोरच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शेतकऱ्याच्या आश्रुला ड्रॅमा म्हणत सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याने पुन्हा एकदा खळबळ उडालीय. चक्क दुःख सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या अश्रुला ड्रॅमा म्हटल्याने शेतकऱ्यांची खिल्ली उडविल्याचा प्रकार दोऱ्यात उघडकीस आलाय.


Body:नामदेव पतंगे अस शेतकऱ्याच नाव आहे. पतंगे हे आयुक्त मूळगावी येणार असल्याने, त्यांच्या प्रतीक्षेत मोठ्या प्रमाणात शेतकरी थांबले होते. दरम्यान, पतंगे यांनी सडक सोयाबीन घेऊन आयुक्तांसमोर धाव घेतली. तर लागलीच जिल्हाधिकारी जयवंशी यांनी या ड्रामेबाजी शेतकऱ्याला ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षारक्षकाला दिल्या त्यावर आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शांत करत त्या शेतकऱ्याला समोर येण्यास सुचविले. शेतकऱ्याने आश्रू हळद आपल्या व्यथा सांगितल्या पिक विमा कंपनी पिक विमा देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे सांगतात किंवा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे आयुक्त केंद्रे यांनी सांगितले तसेच गोरेगाव येथील बँक कर्ज देत नसल्याचेही समोर सांगतात त्यालाही लागलेत सूचना देणार असल्याचे सांगितले. मात्र आयुक्तांसमोर शेतकऱ्यांचे अश्रू हे जिल्हाधिकाऱ्याला ड्रामेबाज वाटले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना कुठे ठेवले नाहीत हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे हतबल झाला आहे अशाच परिस्थितीत स्वतःला धीर देत शेतकरी आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशाच भयंकर अवस्थेत जिल्हाधिकारी हे शेतकऱ्यांच्या अश्रूला ड्रामा ठरवीत आहेत. हा सर्व प्रकार आयुक्तांसमोर घडल्यामुळे आता आयुक्त शेतकऱ्याच्या अश्रूला ड्रामा बया ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा शेतकऱ्यांने निषेध केलाय.


Conclusion:केंद्रा गावाचा होणार कायापालट


तर मूळ गावात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास तह गावाचा विकास करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
भीमा केंद्र येथे गावाच्या विविध समस्या चा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या तसेच गावातील लोकांच्या समस्या समजून घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचविले. जास्तीत जास्त एमआरजीएस योजनेअंतर्गत विहिरी तसेच शालेय शिक्षकांची भरती बाबत, अन कर्ज देण्या संदर्भात संबंधित बँक अधिकाऱ्याला सुचविले एकंदरीत विकासासंदर्भात सूचनांचा भडीमार केल्यामुळे केंद्र या गावाचा कायापालट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.