ETV Bharat / state

औषध फवारणीमुळे हिंगोलीत डेंग्यू नियंत्रणात - Hingoli latest news

संपूर्ण राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी आहे. तर हिंगोलीत पावसाळा लागण्यापूर्वीच आरोग्य विभागाने दाखविलेली समयसूचकता डेंग्यूच्या आजाराची साथ कमी करण्यासाठी उपयोगी पडली आहे.

औषध फवारणीमुळे हिंगोलीत डेंग्यू नियंत्रणात
author img

By

Published : Nov 21, 2019, 11:48 AM IST

हिंगोली - पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने जून महिन्यात 2 वेळा औषध फवारणी केल्यामुळे डेंग्यू सदृश्य परिस्थितीला आळा बसला आहे. जिल्ह्यात घेरलेल्या 109 रक्तजल नमुन्यांपैकी 4 डेंग्यू पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. तर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कितीही सांगण्यात आले तरी, जिल्हासामान्य रुग्णालयात दोघांवर डेंग्यूचे उपचार केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवाजी पवार, जिल्हा आरोग्यधिकारी

हेही वाचा - आयुक्तांसमोर रडणाऱ्या शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले ड्रामेबाज!

संपूर्ण राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी आहे. तर हिंगोलीत पावसाळा लागण्यापूर्वीच आरोग्य विभागाने दाखविलेली समयसूचकता डेंग्यूचा आजाराची साथ कमी करण्यासाठी उपयोगी पडली आहे. डेंग्यू आजराबाबत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने पत्रकाद्वारेही जनजागृती करण्यात आली आहे. तसेच जानेवारी पासून आज पर्यंत 109 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असता, त्यापैकी गिरगाव येथील तपीश नादरे (11), नचिकेत नादरे(6), गायत्री नादरे(7) आणि चाफनाथ येथील रजाक शेख पाशा(50) हे 4 रक्तजल नमुने डेंग्यू पॉजिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा - पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणारच - सुनील केंद्रेकर

तर 28 गावात धूर फवारणी करण्यात आली आहे. सोबतच जिल्हाभरात अँबेटिंग व किटकशास्त्रीय सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या संख्येत घट घट झाली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत वेळेतच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. 5 धूर फवारणी यंत्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. ज्या ग्रामपंचायतकडून धूर फवारणीची मागणी होते. त्या गावात धूर फवारणी केली जात आहे. मात्र, धूर फवारणी करून घेण्यासाठी ग्रामपंचायती सक्रियतेने सहभागी होत नसल्याचे चित्र आहे.

हिंगोली - पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने जून महिन्यात 2 वेळा औषध फवारणी केल्यामुळे डेंग्यू सदृश्य परिस्थितीला आळा बसला आहे. जिल्ह्यात घेरलेल्या 109 रक्तजल नमुन्यांपैकी 4 डेंग्यू पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. तर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कितीही सांगण्यात आले तरी, जिल्हासामान्य रुग्णालयात दोघांवर डेंग्यूचे उपचार केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवाजी पवार, जिल्हा आरोग्यधिकारी

हेही वाचा - आयुक्तांसमोर रडणाऱ्या शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले ड्रामेबाज!

संपूर्ण राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी आहे. तर हिंगोलीत पावसाळा लागण्यापूर्वीच आरोग्य विभागाने दाखविलेली समयसूचकता डेंग्यूचा आजाराची साथ कमी करण्यासाठी उपयोगी पडली आहे. डेंग्यू आजराबाबत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने पत्रकाद्वारेही जनजागृती करण्यात आली आहे. तसेच जानेवारी पासून आज पर्यंत 109 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असता, त्यापैकी गिरगाव येथील तपीश नादरे (11), नचिकेत नादरे(6), गायत्री नादरे(7) आणि चाफनाथ येथील रजाक शेख पाशा(50) हे 4 रक्तजल नमुने डेंग्यू पॉजिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा - पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणारच - सुनील केंद्रेकर

तर 28 गावात धूर फवारणी करण्यात आली आहे. सोबतच जिल्हाभरात अँबेटिंग व किटकशास्त्रीय सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या संख्येत घट घट झाली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत वेळेतच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. 5 धूर फवारणी यंत्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. ज्या ग्रामपंचायतकडून धूर फवारणीची मागणी होते. त्या गावात धूर फवारणी केली जात आहे. मात्र, धूर फवारणी करून घेण्यासाठी ग्रामपंचायती सक्रियतेने सहभागी होत नसल्याचे चित्र आहे.

Intro:


हिंगोली- पावसाळा लागण्यापूर्वीच जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून जून महिन्यात दोन वेळा अबेटिंग ची प्रक्रिया राबविल्याने डेंग्यू सदृश्य परिस्थितीला आळा बसलाय. जिल्ह्यात घेरलेल्या 109 रक्तजल नमुन्यांपैकी 4 डेंग्यू पॉजेटीव्ह आढळून आले. परिस्थिती नियंत्रणात असल्याच सांगत असला तरीही हिंगोलीत जिल्हासामान्य रुग्णालयात दोघावर उपचार करण्यात आल्याचे समोर आलंय.

Body:संपूर्ण राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात हाऊसफुल्ल होत आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण होणार होती, मात्र पावसाळा लागण्यापूर्वी आरोग्यविभागाने दाखविलेली समयसूचकता ही डेंग्यूचा आजाराची साथ कमी करण्यासाठी उपयोगाची ठरलीय. तर डेंग्यू आजराबाबत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने पत्रकाद्वारे ही जनजागृती करण्यात आलीय. तसेच जानेवारी पासून आज पर्यंत 109 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असता त्यापैकी गिरगाव येथील तपीश नादरे (११), नचिकेत नादरे(६), गायत्री नादरे(७) अन चाफनाथ येथील
रजाक शेख पाशा(५०) हे 4 रक्तजल नमुने डेंग्यू पॉझीटिव्ह आले आहेत. तर 28 गावात धूर फवारणी केलीय. सोबतच जिल्हाभरात अँबेटिंग व किटकशास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यामुळे डेंग्यूच्या संख्येत घट घट झालीय. तसेच आरोग्य विभागा मार्फत वेळेतच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. तर 5 धूर फवारणी यंत्र सज्ज ठेवण्यात आले आहेत. ज्या ग्रामपंचायत कडून धूर फवारणीची मागणी येतेय त्या गावात धूर फवारणी केली जातेय. मात्र धूर फवारणी करून घेण्यासाठी ग्रामपंचायत तेवड्या सक्रीयतेने सहभागी होत नसल्याचे चित्र आहे.
Conclusion:
*या डेंग्यूच्या रुग्णावर करण्यात आलेत जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार*
शेख उजमा शेख अनस (३) मस्तानशहा नगर हिंगोली, आयुष आनंद पाईकराव (७) विवेकानंद नगर हिंगोली या दोन रुग्णावर उपचार करण्यात आलेत.


*डेंग्यू बाबत करण्यात आले असे आव्हाहन*

डेंग्यूची ही आहेत करणे

विशिष्ट विषाणूमुळे होतो डेंगू हा आजार

डेंग्यूचा प्रसार हा एजिपटाय
नावाच्या डासापासून होतोय

डासांची उत्पत्ती ही साठलेल्या पाण्यात होतेय एवढेच नव्हे तर इमारतीच्या करवंद या तसेच घरातील शोभेच्या कुंड्या फुलदाण्या निरुपयोगी टायर कूलर एसी आधी मध्ये साठलेल्या पाण्यामध्ये देखील डासांची उत्पत्ती होते.

ही आहेत डेंग्यूची लक्षणे

एडिस एजिपटाय डासा तुमच्या संक्रमणात्मक चाव्यानंतर पाच ते सहा दिवसांनी डेंग्यूची लागण होते. यामध्ये डेंगू ताप आणि डेंगू रक्तस्त्रावात्मक ताप अशा दोन प्रकारे हा आजार पसरतो.
हा ताप अधिक तीव्र स्वरूपाचा असून, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. सर्वाधिक जास्त हा ताप लहान मुलांमध्ये सॊम्य स्वरूपाचा येतो तर मोठया व्यक्ती मध्ये तीव्र स्वरूपाचा असतो. ताप येणे तसेच डोक दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, आंगावर लाल रंगाचा चट्टा येतो.

*ही काळजी घेणे गरजेचे*

घराभोवती केरकचरा, रिकामे पिपे, टायर्स तसेच बॅटरी आदी अनावश्यक बाबींमुळे पाणी साचून डासांची निर्मिती होते. त्यामुळे त्याची ताबडतोब विल्हेवाट लावावी तर साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

घरा शेजारचा परिसर स्वच्छ करून जंतुनाशक पावडर टाकावी तसेच गटारी साफ करत वाहत्या कराव्यात

पाण्याची डबकी बुजवावीत तसेच कायमस्वरूपी डास उत्पत्ती स्थानांमध्ये, तलावात, विहिरीत गप्पी मासे सोडावेत.

घरातील पाणी साठविण्यासाठी भांडी कोरडी करावीत. तसेच छतावरील पाण्याच्या टाक्यांना झाकण लावावे, त्याचबरोबर संडासच्या व्हेट पाईपला जाळी लावावी.


बाईट- जिल्हा आरोग्यधिकारी शिवाजी पवार


व्हिज्युअल- रुग्णालय,
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.