गोंदिया - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांना आहे तिथेच राहावे. त्यांच्यासाठी निवार केंद्र तयार करण्यात आले आहेत. आता त्यांच्या मनोरंजनासाठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. परप्रांतीय मजूर, नागरिकांना निवारा केंद्र ठेवण्यात आले आहे. त्यांना कुठल्या अडचणी आहेत काय?, याचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री शनिवारी गोंदियात आले होते. यावेळी ते बोलत होते.
देशमुखांनी २५ एप्रिलला गोंदियामध्ये आढावा बैठक घेतली. त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांना गोंदियातील निवारा केंद्राला भेट दिली. यामध्ये बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश आदी परप्रातांतून आलेल्या मजुरांना ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्या अडचणी आहेत का? याची विचारपूस देशमुखांनी केले. तसेच सर्वांना आपआपल्या घरी परत जायचे आहे. मात्र, सध्या त्यांना परत पाठविता येणार नाही. लवकरच सर्व राज्याचे मुख्यमंत्री मजुरांच्या घरवापसीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करतील. पंतप्रधानांनी परवानगी दिल्यास रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून मजुरांची घरवापसी केली जाईल. मात्र, लॉकडाऊनमध्ये एकाही परप्रांतियांना घरी पाठवता येणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.