ETV Bharat / sitara

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे भूमी पेडणेकरचे आवाहन

author img

By

Published : Aug 17, 2020, 3:25 PM IST

गणेश चतुर्थी अगदी लवकरच असल्याने अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने सर्वांना पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तींची निवड करण्याचे आवाहन केले. हा संदेश पोहोचवण्यासाठी भूमीने महाराष्ट्रातील शिल्पकार आणि पर्यावरण कार्यकर्ते दत्ताद्री यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

Bhumi Pednekar
भूमी पेडणेकर

मुंबई : गणपती उत्सव साजरा करण्याचे शाश्वत मार्ग असल्याचे अभिनेता भूमी पेडणेकर हिने सांगितले आहे. सर्वांनी पर्यावरणपूरक मूर्ती निवडण्याचे आवाहन तिने केले आहे.

"हा माझा आवडता सण आहे आणि आम्ही अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबात गणपती साजरा करत आहोत. हवामान संवर्धनाच्या मार्गावर मी जात असल्याने मला जाणवले आहे, की हा उत्सव साजरा करण्याचे आणखी चांगले मार्ग, अधिक टिकाऊ मार्ग आहेत. निसर्ग देव आहे, देव निसर्ग आहे. आम्हाला आणखी चांगले पर्याय शोधावे लागतील'', असेही पर्यावरण कार्यकर्ती असलेल्या भूमी हिने सांगितले.

हा संदेश पोहोचवण्यासाठी भूमीने महाराष्ट्रातील शिल्पकार आणि पर्यावरण कार्यकर्ते दत्ताद्री यांच्याशी हातमिळवणी केली आहे. दत्ताद्री मूर्तीच्या आत लावलेल्या बियाण्यासह झाडांच्या गणपतीच्या मूर्ती बनविण्यात माहिर आहेत. एकदा उत्सव संपल्यावर मूर्ती मातीच्या भांड्यात विसर्जित केली जाऊ शकते.

इको-फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती घरी बनवण्याचे अनेक मार्ग ते स्वतः अपलोड करतील.

"मला खरोखरच आशा आहे की यासारख्या संकल्पना पुढील पिढ्यांपर्यंत पर्यावरणीय संवर्धनाचा संदेश देण्यासाठी नागरिकांनी अवलंबल्या पाहिजेत. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी क्रांतिकारक अशा या कल्पना आहेत, लोक असे कार्य करण्यासाठी यासारख्या पर्यावरणास अनुकूल पर्याय निवडण्यास प्रेरित होतील, अशी मला आशा आहे" असे ती पुढे म्हणाली.

भूमी म्हणाल्या, "लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यांना हे समजवून द्यायला हवे की, पर्यावरणास जागरूक राहून आपण उत्सव उत्सवात साजरे करू शकतो."

मुंबई : गणपती उत्सव साजरा करण्याचे शाश्वत मार्ग असल्याचे अभिनेता भूमी पेडणेकर हिने सांगितले आहे. सर्वांनी पर्यावरणपूरक मूर्ती निवडण्याचे आवाहन तिने केले आहे.

"हा माझा आवडता सण आहे आणि आम्ही अनेक वर्षांपासून माझ्या कुटुंबात गणपती साजरा करत आहोत. हवामान संवर्धनाच्या मार्गावर मी जात असल्याने मला जाणवले आहे, की हा उत्सव साजरा करण्याचे आणखी चांगले मार्ग, अधिक टिकाऊ मार्ग आहेत. निसर्ग देव आहे, देव निसर्ग आहे. आम्हाला आणखी चांगले पर्याय शोधावे लागतील'', असेही पर्यावरण कार्यकर्ती असलेल्या भूमी हिने सांगितले.

हा संदेश पोहोचवण्यासाठी भूमीने महाराष्ट्रातील शिल्पकार आणि पर्यावरण कार्यकर्ते दत्ताद्री यांच्याशी हातमिळवणी केली आहे. दत्ताद्री मूर्तीच्या आत लावलेल्या बियाण्यासह झाडांच्या गणपतीच्या मूर्ती बनविण्यात माहिर आहेत. एकदा उत्सव संपल्यावर मूर्ती मातीच्या भांड्यात विसर्जित केली जाऊ शकते.

इको-फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती घरी बनवण्याचे अनेक मार्ग ते स्वतः अपलोड करतील.

"मला खरोखरच आशा आहे की यासारख्या संकल्पना पुढील पिढ्यांपर्यंत पर्यावरणीय संवर्धनाचा संदेश देण्यासाठी नागरिकांनी अवलंबल्या पाहिजेत. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी क्रांतिकारक अशा या कल्पना आहेत, लोक असे कार्य करण्यासाठी यासारख्या पर्यावरणास अनुकूल पर्याय निवडण्यास प्रेरित होतील, अशी मला आशा आहे" असे ती पुढे म्हणाली.

भूमी म्हणाल्या, "लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यांना हे समजवून द्यायला हवे की, पर्यावरणास जागरूक राहून आपण उत्सव उत्सवात साजरे करू शकतो."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.