ठाणे - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात आज साजरा होत आहे. मुंबई - नाशिक महामार्गावरील त्यांचे निवासस्थान असलेल्या दिवा अंजूर गावात सकाळपासूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारो समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे, नाशिक - मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
मंत्री कपिल पाटीलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांची गर्दी, महामार्गावर वाहतूक कोंडी
मंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. मुंबई - नाशिक महामार्गावरील त्यांचे निवासस्थान असलेल्या दिवा अंजूर गावात सकाळपासूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारो समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे, नाशिक - मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी कपिलोत्सव म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे. वाढदिवसा निमित्त सुरु असलेला हा कपिलोत्सव 8 दिवस साजरा करत असतानाच आज त्यांच्या वाढदिवशी महामार्गाच्या दोन्ही बाजूने तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
हेही वाचा - ...तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना घेराव घालणार -देवेंद्र फडणवीस
ठाणे - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात आज साजरा होत आहे. मुंबई - नाशिक महामार्गावरील त्यांचे निवासस्थान असलेल्या दिवा अंजूर गावात सकाळपासूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारो समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे, नाशिक - मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी कपिलोत्सव म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे. वाढदिवसा निमित्त सुरु असलेला हा कपिलोत्सव 8 दिवस साजरा करत असतानाच आज त्यांच्या वाढदिवशी महामार्गाच्या दोन्ही बाजूने तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
हेही वाचा - ...तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना घेराव घालणार -देवेंद्र फडणवीस