ETV Bharat / city

BMC To Stop Monsoon Disease : पावसाळी साथीच्या आजारांना रोखण्यासाठी पालिकेचा अॅक्शन प्लॅन

author img

By

Published : Jul 4, 2022, 7:29 PM IST

मुंबईमध्ये दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाळी आजार ( Monsoon Desease ) वाढतात. गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूचा प्रसार असल्याने पावसाळी आजारांचे प्रमाण कमी होते. मात्र, आता निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा पावसाळी आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ( Health Department of Mumbai Municipal Corporation ) आजार रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. याद्वारे साथीचे आजार रोखण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

Monsoon Desease
Monsoon Desease

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू, हिवताप स्वाईन फ्ल्यू यासारखे आजार ( Monsoon Desease ) समोर येतात. मागील वर्षापर्यंत या आजारांमुळे काही मृत्यूही झाले होते. यावर्षी आतापर्यंत पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही. यासाठी आजार आणि मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. साथीचे आजार वाढल्यास वेळीच उपचार मिळावे यासाठी पालिकेच्या विविध रुग्णालयात दीड हजार बेड्स अॅक्टिव्ह करण्यात आले आहेत. गरज पडल्यास बेड्सची संख्या वाढवण्यात येणार आहे. मलेरिया रुग्णांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी भर दिला जात असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू या आजाराचे रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी औषधसाठा पुरेसा उपलब्ध करण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका असून यासाठी संपूर्ण मुंबईतून रोज पाण्याचे २०० नमुने संकलित करण्यात येत असून कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.



पालिकेकडून जनजागृती - पावसाळी आजार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात बॅनर्स, होडिंग, पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. तसेच आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली आहे. पाणी उकळून व गाळून प्यावे, आपल्या परिसरात पाणी जमा होऊ देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन गोमारे यांनी मुंबईकरांना केले आहे.

गेल्या सहा महिन्यात एकही मृत्यू नाही - १ जानेवारी ते २६ जून २०२२ पर्यंत मलेरियाचे १२०७, लेप्टोचे ३४, डेंग्यूचे ११७, गॅस्ट्रोचे २८१९, हेपॅटिटीसचे २४६, चिकनगुनियाचे ५ तर एच १ एन १ चे ४ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यात पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही. १ ते २६ जून २०२२ पर्यंत मलेरियाचे ३१४, लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३३, गॅस्ट्रोचे ४५६, हेपॅटिटीसचे ५७, चिकनगुनियाचे १ तर एच १ एन १ चे २ रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या दोन वर्षातील आजारांचे प्रमाण - २०२१ मध्ये मलेरियाचे ५१७२, लेप्टोचे २२४, डेंग्यूचे ८७६, गॅस्ट्रोचे ३११०, हेपॅटिटीसचे ३०८, चिकनगुणियाचे ८० तर एच १ एन १ चे ६४ रुग्ण आढळून आले आहेत. २०२१ मध्ये मलेरियाचा १, लेप्टोचे ६, डेंग्यूचे ५ तर हेपॅटिटीसच्या १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर २०२० मध्ये मलेरियाचे ५००७, लेप्टोचे २४०, डेंग्यूचे १२९, गॅस्ट्रोचे २५४९, हेपॅटिटीसचे २६३, एच १ एन १ ४४ रुग्ण आढळून आले आहेत. २०२० मध्ये मलेरियाचा १, लेप्टोचे ८, डेंग्यूचे ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

मृत्यू संख्या घटली - जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३, हेपॅटिटीसचे १, एच १ एनमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये मलेरियाच्या १, लेप्टोच्या ८, डेंग्यूच्या ३ अशा १२ जणांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये मलेरियामुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५ तर हेपॅटिटीसमुळे १ अशा १२ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत एकही मृत्यू झालेला नाही.

हेही वाचा - CM Shinde In Vidansabha : आम्ही बंडखोर नाही, आता माघार नाही : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू, हिवताप स्वाईन फ्ल्यू यासारखे आजार ( Monsoon Desease ) समोर येतात. मागील वर्षापर्यंत या आजारांमुळे काही मृत्यूही झाले होते. यावर्षी आतापर्यंत पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही. यासाठी आजार आणि मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. साथीचे आजार वाढल्यास वेळीच उपचार मिळावे यासाठी पालिकेच्या विविध रुग्णालयात दीड हजार बेड्स अॅक्टिव्ह करण्यात आले आहेत. गरज पडल्यास बेड्सची संख्या वाढवण्यात येणार आहे. मलेरिया रुग्णांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी भर दिला जात असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू या आजाराचे रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी औषधसाठा पुरेसा उपलब्ध करण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका असून यासाठी संपूर्ण मुंबईतून रोज पाण्याचे २०० नमुने संकलित करण्यात येत असून कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.



पालिकेकडून जनजागृती - पावसाळी आजार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात बॅनर्स, होडिंग, पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. तसेच आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली आहे. पाणी उकळून व गाळून प्यावे, आपल्या परिसरात पाणी जमा होऊ देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन गोमारे यांनी मुंबईकरांना केले आहे.

गेल्या सहा महिन्यात एकही मृत्यू नाही - १ जानेवारी ते २६ जून २०२२ पर्यंत मलेरियाचे १२०७, लेप्टोचे ३४, डेंग्यूचे ११७, गॅस्ट्रोचे २८१९, हेपॅटिटीसचे २४६, चिकनगुनियाचे ५ तर एच १ एन १ चे ४ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यात पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही. १ ते २६ जून २०२२ पर्यंत मलेरियाचे ३१४, लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३३, गॅस्ट्रोचे ४५६, हेपॅटिटीसचे ५७, चिकनगुनियाचे १ तर एच १ एन १ चे २ रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या दोन वर्षातील आजारांचे प्रमाण - २०२१ मध्ये मलेरियाचे ५१७२, लेप्टोचे २२४, डेंग्यूचे ८७६, गॅस्ट्रोचे ३११०, हेपॅटिटीसचे ३०८, चिकनगुणियाचे ८० तर एच १ एन १ चे ६४ रुग्ण आढळून आले आहेत. २०२१ मध्ये मलेरियाचा १, लेप्टोचे ६, डेंग्यूचे ५ तर हेपॅटिटीसच्या १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर २०२० मध्ये मलेरियाचे ५००७, लेप्टोचे २४०, डेंग्यूचे १२९, गॅस्ट्रोचे २५४९, हेपॅटिटीसचे २६३, एच १ एन १ ४४ रुग्ण आढळून आले आहेत. २०२० मध्ये मलेरियाचा १, लेप्टोचे ८, डेंग्यूचे ३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

मृत्यू संख्या घटली - जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये लेप्टोचे ११, डेंग्यूचे ३, हेपॅटिटीसचे १, एच १ एनमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये मलेरियाच्या १, लेप्टोच्या ८, डेंग्यूच्या ३ अशा १२ जणांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये मलेरियामुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५ तर हेपॅटिटीसमुळे १ अशा १२ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत एकही मृत्यू झालेला नाही.

हेही वाचा - CM Shinde In Vidansabha : आम्ही बंडखोर नाही, आता माघार नाही : मुख्यमंत्री शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.