ETV Bharat / city

औरंगाबादेतील अखंड उड्डाणपुलाला नितीन गडकरींचा हिरवा कंदील - इम्तियाज जलील

author img

By

Published : Aug 9, 2021, 3:12 AM IST

Updated : Aug 9, 2021, 3:20 AM IST

शहराच्या भविष्याचा विचार करत विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबा पेट्रोल पंप चौक ते चिकलठाणापर्यंतच्या अखंड उड्डाणपूलाला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. अशी माहिती एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

flyover in Aurangabad
flyover in Aurangabad

औरंंगाबाद - शहराच्या भविष्याचा विचार करत विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबा पेट्रोल पंप चौक ते चिकलठाणापर्यंतच्या अखंड उड्डाणपूलाला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. अशी माहिती एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार जलील म्हणाले की, गडकरी यांनी अखंड उड्डाण पुलाकरिता एका महिन्यात तज्ञ एजन्सीकडून सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शहरात भविष्यात होणारे बदल व शहराचा विकास होण्यासाठी औरंगाबामध्ये चिकलठाणा ते बाबा पेट्रोलपंप चौकाला जोडणारा एकच अखंड उड्डाणपूल बनू शकतो. ज्यामुळे शहरातील सर्वात महत्वाच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर लवकरच काम होणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

माहिती देताना खासदार इम्तियाज जलील

या बैठकीत जालना रस्त्यावरील सध्याच्या कामावर सुध्दा सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले. चिकलठाणा विमानतळासमोरील उड्डाणपुलाबाबतच्या आपल्या आक्षेपाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सविस्तर माहिती दिली आणि त्यांना सांगितले की, इतर लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकार्‍यानीही असाच आक्षेप घेतला आहे.


नितीन गडकरींनी जालना रस्त्यावरील नकाशाचा आढावा घेतल्यानंतर विमानतळासमोरील उड्डाणपूल रद्द करण्याच्या सूचना दिल्या आणि विमानतळ ते थेट बाबा पेट्रोलपंप चौकाला जोडणारा एक मोठा उड्डाणपूल करण्याचे मान्य केले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.

औरंंगाबाद - शहराच्या भविष्याचा विचार करत विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबा पेट्रोल पंप चौक ते चिकलठाणापर्यंतच्या अखंड उड्डाणपूलाला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. अशी माहिती एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार जलील म्हणाले की, गडकरी यांनी अखंड उड्डाण पुलाकरिता एका महिन्यात तज्ञ एजन्सीकडून सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शहरात भविष्यात होणारे बदल व शहराचा विकास होण्यासाठी औरंगाबामध्ये चिकलठाणा ते बाबा पेट्रोलपंप चौकाला जोडणारा एकच अखंड उड्डाणपूल बनू शकतो. ज्यामुळे शहरातील सर्वात महत्वाच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर लवकरच काम होणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

माहिती देताना खासदार इम्तियाज जलील

या बैठकीत जालना रस्त्यावरील सध्याच्या कामावर सुध्दा सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले. चिकलठाणा विमानतळासमोरील उड्डाणपुलाबाबतच्या आपल्या आक्षेपाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सविस्तर माहिती दिली आणि त्यांना सांगितले की, इतर लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकार्‍यानीही असाच आक्षेप घेतला आहे.


नितीन गडकरींनी जालना रस्त्यावरील नकाशाचा आढावा घेतल्यानंतर विमानतळासमोरील उड्डाणपूल रद्द करण्याच्या सूचना दिल्या आणि विमानतळ ते थेट बाबा पेट्रोलपंप चौकाला जोडणारा एक मोठा उड्डाणपूल करण्याचे मान्य केले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.

Last Updated : Aug 9, 2021, 3:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.