ETV Bharat / bharat

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक

author img

By

Published : Jul 27, 2022, 7:03 AM IST

Updated : Jul 27, 2022, 1:25 PM IST

जिल्ह्यातील यारीपोरा येथील ब्रायिहार्ड काठपोरा गावात अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली आहे. ब्रायिहार्ड काठपोरा भागात गोळीबार सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी ट्विटद्वारे दिली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

कुलगाम (जम्मू काश्मीर) - जिल्ह्यातील यारीपोरा येथील ब्रायिहार्ड काठपोरा गावात अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली आहे. ब्रायिहार्ड काठपोरा भागात गोळीबार सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी ट्विटद्वारे दिली आहे. 24 जुलै रोजी, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील रामपोरा भागात देखील दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Video : बाप रे.. तब्बल ७.५ फूट उंचीचा जवान.. सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची उडतेय झुंबड..

दहशतवादी हल्ल्यात इतका नागरिकांचा मृत्यू - 5 ऑगस्ट 2019 ते 9 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 128 सुरक्षा दलाचे जवान आणि 118 नागरिक मारले गेले, अशी लेखी माहिती 20 जुलै रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली होती. केंद्रीय मंत्री म्हणाले की, एकूण 118 नागरिक ठार झाले, त्यापैकी पाच काश्मिरी पंडित आणि 16 इतर हिंदू/शीख समुदायाचे होते. 5 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून किती नागरिक, यात्रेकरू आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले आणि त्यापैकी किती हिंदू आणि काश्मीर पंडित आहेत, या प्रश्नाचे उत्तर देण्याची मागणी करणाऱ्या एका प्रश्नाला मंत्री उत्तर देत होते.

दहशतवादी हल्ल्यात घट - सरकारचे दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण असून, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. दहशतवादी हल्ले 2018 मध्ये 417 वरून 2021 मध्ये 229 पर्यंत घटले आहेत. पंतप्रधानांच्या विकास पॅकेज अंतर्गत, 5 हजार 502 काश्मिरी पंडितांना खोऱ्यात सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या, असे राय यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले. पुढे, नोंदीनुसार, या कालावधीत कोणत्याही काश्मिरी पंडिताने खोऱ्यातून स्थलांतर केले नाही, असे राय यांनी सांगितले होते.

हेही वाचा - Sunrise Over Ayodhya : सलमान खुर्शीद यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी.. न्यायालयात याचिका

कुलगाम (जम्मू काश्मीर) - जिल्ह्यातील यारीपोरा येथील ब्रायिहार्ड काठपोरा गावात अतिरेकी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली आहे. ब्रायिहार्ड काठपोरा भागात गोळीबार सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी ट्विटद्वारे दिली आहे. 24 जुलै रोजी, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील रामपोरा भागात देखील दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Video : बाप रे.. तब्बल ७.५ फूट उंचीचा जवान.. सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची उडतेय झुंबड..

दहशतवादी हल्ल्यात इतका नागरिकांचा मृत्यू - 5 ऑगस्ट 2019 ते 9 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 128 सुरक्षा दलाचे जवान आणि 118 नागरिक मारले गेले, अशी लेखी माहिती 20 जुलै रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली होती. केंद्रीय मंत्री म्हणाले की, एकूण 118 नागरिक ठार झाले, त्यापैकी पाच काश्मिरी पंडित आणि 16 इतर हिंदू/शीख समुदायाचे होते. 5 ऑगस्ट 2019 पासून आजपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून किती नागरिक, यात्रेकरू आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले आणि त्यापैकी किती हिंदू आणि काश्मीर पंडित आहेत, या प्रश्नाचे उत्तर देण्याची मागणी करणाऱ्या एका प्रश्नाला मंत्री उत्तर देत होते.

दहशतवादी हल्ल्यात घट - सरकारचे दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण असून, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. दहशतवादी हल्ले 2018 मध्ये 417 वरून 2021 मध्ये 229 पर्यंत घटले आहेत. पंतप्रधानांच्या विकास पॅकेज अंतर्गत, 5 हजार 502 काश्मिरी पंडितांना खोऱ्यात सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या, असे राय यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले. पुढे, नोंदीनुसार, या कालावधीत कोणत्याही काश्मिरी पंडिताने खोऱ्यातून स्थलांतर केले नाही, असे राय यांनी सांगितले होते.

हेही वाचा - Sunrise Over Ayodhya : सलमान खुर्शीद यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी.. न्यायालयात याचिका

Last Updated : Jul 27, 2022, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.