महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : देहू येथील इंद्रायणी काठचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या..

By

Published : Jun 20, 2022, 12:34 PM IST

देहू (पिंपरी) - जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ( significance of Indrayani river bank at Dehu ) आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर या वर्षी पालखी ( Indrayani river bank Dehu ) सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे, यंदा लाखोंच्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. देहू येथील इंद्रायणीकाठी हजारो भाविक हे दाखल झाले असून या ठिकाणी राज्यभरातून आलेले वारकरी हे पहिले स्नान करतात आणि मगच वारीत सहभागी होत असतात. देहू येथील इंद्रायणी काठचा नेमका इतिहास काय? इथ वारकरी का स्नान करतात? याचे महत्त्व काय आहे? पाहा ईटीव्ही भारतचा हा रिपोर्ट.

ABOUT THE AUTHOR

...view details