पाणीप्रश्नावरून मुंबईत आरपीआयचा हंडा मोर्चा; सरकारविरोधात घोषणाबाजी - बोरिवलीत आरपीआयचा हंडा मोर्चा
मुंबई - बोरिवली पश्चिमेला असलेला गोराई परिसरात मोठ्या संख्यामध्ये झोपडपट्टी आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना पाणी समस्येला समोरे जावे लागत आहे. या विरोधात आज आरपीआयच्यावतीने बोरिवली पश्चिमेत मुंबई महानगरपालिका आरमध्ये कार्यालयावर महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.