महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 24, 2020, 4:19 PM IST

ETV Bharat / videos

आठवडाभर दडी मारल्यानंतर पालघरमध्ये पावसाचे पुनर्रागमन; शेतकऱ्यांना दिलासा

जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली असून पालघर, बोईसरसह आसपासच्या परिसरात सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.पावसाने दडी मारल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. मात्र सकाळपासूनच परिसरात पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन असल्याने पालघरकर सध्या घरात बसून पावसाचा आनंद घेत आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत मुंबईसह २५ व २६ जुलैला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details