कोल्हापुरात पुराचं थैमान, जीव मुठीत धरुन लोक पाहतायेत मदतीची वाट - panchganga
शहरासह जिल्हात पडत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला आहे. नद्यांनी रौद्ररुप धारण केले असून, नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्याची पूरस्थिती ही २००५ च्या पुरापेक्षा गंभीर आहे. या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.