तौक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरीला तडाखा.. जिल्ह्यातील स्थितीचा आढावा - तौक्ते चक्रीवादळ
अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळले असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील अनेक गावातील घरांवरील पत्रे व कौले उडून गेली असून बारे ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहत आहेत. दुपारी २ नंतर रत्नागिरी आणि परिसरात वादळाचा प्रभाव वाढू लागल्याचे दिसून आले. मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे.