नवी दिल्ली - देशात सद्या महागाईचा भडका उडाला आहे. यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारला खोचक टोला लगावला आहे. देशात काही दिवसांपूर्वीच पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे महागाई वाढत नव्हती. मात्र, निवडणुका संपताच देशात महागाई वाढू लागली आहे. त्यामुळे या देशातल्या महागाईला केवळ निवडणुकाच थांबवू शकते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST