अनुराग कश्यप, तापसी पन्नु प्रकरणावर काय म्हणाले संजय राऊत; पाहा व्हिडीओ - sanjay raut reaction on it raid
मुंबई - कोणत्याही प्रकरणात तपास करण्याचा सरकारला पूर्ण अधिकार आहे. मात्र, शेतकऱ्यांना पाठिंबा देतात, जेएनयू बाबत बोलतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे, असे बोलतात म्हणून कारवाई होत असेल, तर ते चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. जर एखाद्या इंडस्ट्रीवर अश्याप्रकारे हल्ला होत असेल, तर तिथल्या सर्वांनी एकत्र आवाज उठवला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.