महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी एक वर्षाच्या कालावधीत सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचा लेखाजोखा मांडला. तसेच शालेय शिक्षण विभागातील निर्णय विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचे असल्याचा दावा केला. महामारीच्या काळात शाळांची परिस्थिती सुधारून आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया रचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.