महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हात सैल - भुजबळ - Chhagan Bhujbal Budget news
आजच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेले नाही. ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांसाठी केंद्राचा हाथ सैल आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्या वाट्याला उपेक्षा आली असून, रोजगार निर्मितीबद्दल कोणत्याही योजना या अर्थसंकल्पात नाही. जर केंद्र डिजिटल जनगणना करणार असेल, तर त्यांनी ओबीसींची जनगणनाही करावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
Last Updated : Feb 1, 2021, 5:48 PM IST