जालना : जुई धरण ओव्हरफ्लो, भोकदरसह 20 गावांचा पाणी प्रश्न मिटला - जालना जुई धरण ओव्हर फ्लो
जालना : जालन्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प सततच्या मुसळधार पावसामुळे तुडूंब भरले आहे. जुई धरण आता ओसंडून वाहू लागले आहे. भोकरदन तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा लाभ दानापूर येथील जुई धरणाला झाला आहे. त्यामुळे आता भोकरदन शहरासह तालुक्यातील २० गावांचा पाणी प्रश्न निकाली लागला आहे.