महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

2030 पासून मुंबईकरांचा प्रवास 'सुपर-सुपर फास्ट'; एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त के एच गोविंद राज यांच्याशी बातचीत..

By

Published : Dec 5, 2020, 7:10 AM IST

Updated : Dec 5, 2020, 12:11 PM IST

शहर आणि मुंबई महानगर परदेशातील (एमएमआर) वाहतूक व्यवस्था मजबूत करत येथे अत्याधुनिक वाहतूक सेवेचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातूनच एमएमआरमध्ये कोस्टल रोड, सागरी सेतू, मल्टीमॉडेल कॉरिडॉर, उड्डाण पूल असे विविध वाहतूक सेवा प्रकल्प सुरू आहेत. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास ते एकमेकांशी जोडले जाणार आहेत. तर हे सर्व प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होणार आहेत. एकुणच 2030 पर्यंत एमएमआरमध्ये रिंगरूट तयार होणार असून यामुळे मुंबईकर-नवी मुंबईकरांचा प्रवास 'सुपर-सुपर फास्ट' होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडी) चे अतिरिक्त महानगर आयुक्त के एच गोविंद राज यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
Last Updated : Dec 5, 2020, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details