निसर्ग चक्रीवादळ : किनारपट्टीवर तटरक्षक दल तैनात
मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी किनारपट्टीवर एनडीआरएफसह तटरक्षक दलाला तैनात करण्यात आले आहे. जुहू चौपाटीवरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी...