औरंगाबाद - रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरू असलेल्या संघर्षामध्ये ( Russia Ukraine War) भारतीय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्या विद्यार्थ्यांना मायदेशी भारत सरकार सुखरुप आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक विद्यार्थी भारतात परतले आहेत. गुरुवारी (दि. 3 मार्च) औरंगाबादमधील सात विद्यार्थी स्वगृही आले आहेत. विमानतळावर पालकांना आनंदाश्रू अनावर झाले. आपली मुलं परतल्याने नातेवाईकांसह मित्र परिवाराने आनंदोत्सव साजरा केला. भूमिका शार्दूल, यश कमटमकर, पियुष कमटमकर, ऋतिका चव्हाण, उत्कर्ष सानप या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युद्धजन्य परिस्थितीतूनही सुखरुपपणे घरी परतल्याने विद्यार्थी भावूक झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST