Ministry: मंत्रालयात प्रवेशासाठी जनतेच्या लांबच्या लांब रांगा; पाहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट - People have to queue up to go to the ministry
मुंबई - राज्यात नाट्यमय सत्तांतर होऊन सामान्य जनतेचे सरकार म्हणून शिंदे -फडणवीस सरकार अस्तित्वात आले व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मंत्रालयाचे दरवाजे पूर्णतः उघडे झाले. परंतु, तीन महिन्यानंतर हे दरवाजे काही प्रमाणात बंद करण्यात आले असून आता मंत्रालयात मागील महिनाभरापासून दुपारी दोन नंतर व मुख्यमंत्री कार्यालयात ३ नंतर प्रवेश दिला जातो. या कारणास्तव राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढत असून कधीकधी दिवस काढूनही त्यांना आत मध्ये जाण्यासाठी प्रवेश पास दिला जात नाही. याचाच मंत्रालय परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST
TAGGED:
मंत्रालयात जाण्यासाठी रांगा