Maharashtra Farmers Suicide राज्यातील शेतकरी आत्महत्येवरून नाना पटोलेंचा शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा - Bharatiya Janata Party
Maharashtra Farmers Suicide मुंबई राज्यामध्ये एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून जवळपास दीडशे शेतकऱ्यांनी आत्महत्या Farmers Suicide केल्या आहेत. राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कोणतेही देणं घेणं नाही. मड्यावरचा टाळूच लोणी खाणार आहे. विरोधात असताना शेतकरी आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारवर State Govt गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करत होते. त्यामुळे आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्या बाबत राज्य सरकारवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधान भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST