महाराष्ट्र

maharashtra

Bachu Kadu आमच्यातील वाद मिटला; विषय आता मीडियाने थांबवला पाहिजे- बच्चू कडू

By

Published : Nov 4, 2022, 7:52 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

नागपूर माझा आणि रवी राणा Ravi Rana यांच्यातील वाद मिटला आहे. त्यामुळे विषय आता मीडियाने थांबवला पाहिजे. असे वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू Former Minister Bachu Kadu यांनी केले आहे. त्याच बरोबर त्यांनी राणा कडू वादाचे खापर एकप्रकारे मीडियावर फोडले आहे. मी सामान्य माणसासाठी काम करणार असल्याचे ही सभेत बोललो होतो, मात्र तुम्ही ते दाखवले नाही. असा टोला देखील त्यांनी लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल माझ्या मतदारसंघातील प्रकल्पासाठी मंजुरी दिली, निधी ही देणार आहे. वीस हजार एकर शेती सिंचनाखाली येणार agriculture will come under irrigation आहे. लोकांचे प्रश्न मार्गी लागतच आहेत. वीस हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. ती काय माझी एकट्याची जमीन आहे का लोकांची जमीन आहे. मी त्यांना धन्यवाद मानतो अस ते म्हणाले आहेत. मी रवी राणाचे ही आभार मानले होते. मी फुल घेऊन येतो वाटल्यास तुम्ही तलवार घेऊन या, माझ्या शरीराचा कुठला तुकडा पाहिजे ते सांगा. दोन तीन दिवसानंतर मी माझ्या गावातच असणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details