चिखली-आंबेवाडी गावात बचावकार्य सुरू, ईटीव्ही भारत'ची पूर स्थितीबाबत एनडीआरएफ'च्या जवानांशी बातचीत - कोल्हापूर जिल्हा पूराच्या बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षीही अनेक गावांसह शहरातील काही भागांत महापुराचे पाणी शिरले आहे. अनेक गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. तर, काही जणांना एनडीआरएफसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवानांकडून सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ पथकातील जवान निवृत्ती बरड यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी-