Arvind Sawant on Environment : 'आपल्या गोष्टी विनाशाकडे जायला नको' - अरविंद सावंत - शिवसेना खासदार अरविंद सावंत
नवी दिल्ली - पर्यावरणीय समस्येकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. कोरोना काळात नद्या स्वच्छ होत्या. मुंबईच्या समुद्रकिनारी कधी नव्हे ते डॉल्फीन पाहण्यास मिळाले हे सांगताना सावंत यांनी याचबरोबर त्यांनी पाणी, हरितद्रव्य आणि कार्बन उत्सर्न या तीन गोष्टींकडे लक्ष वेधले. आता तापमान नियंत्रित करणे कठीण आहे. याबद्दल संशोधकांनीही नमूद केले आहे. आपल्या गोष्टी विनाशाकडे जायला नको. तसेच या तीन गोष्टींवर हल्ला होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. ईलेक्ट्रीकल वेहिकल्समधील बॅटरी ही पर्यावरणास हानिकारक असल्याचेही खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST