कोविडमधून बरे झाल्यावरही पुन्हा संसर्ग का होतो आणि बरे झाल्यानंतरचा कालावधी महत्वाचा का आहे. आम्ही खाली जी माहिती देत आहोत, ती तुम्हाल ज्ञात असणे आवश्यक आहे. कोविड-१९ चा पुन्हा संसर्ग झाल्यावर त्यातून बरे होणे आणि त्यानंतरचा कालावधी का अत्यंत महत्वाचा आहे?
भारतात कोविड-१९ च्या दुसर्या लाटेने निर्माण केलेला प्रकोप सुरू असतानाच, कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही तसेच एकदा कोविडमधून बरे झाल्यावरही पुन्हा कोविडचा संसर्ग झाल्याच्या तक्रारी लोक करू लागले आहेत. परंतु, आता कोविडचा संसर्ग झाल्यामुळे किंवा लस घेतल्यामुळे अनेक लोकांच्या शरिरात जे अँटीबॉडीज(प्रतिपिंड) तयार झाले आहेत, त्यामुळे पुन्हा संसर्ग होणे शक्य आहे का? तसेच, एकदा संसर्ग झाल्यावर, त्यानंतरचा दुसरा आठवडा आणि कोविडमधून पूर्ण बरे झाल्यानंतरचे दोन आठवड्यांचा कालावधी हा का अत्यंत महत्वाचा आहे? हैदराबाद स्थित व्हीआयएनएन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले तज्ञ डॉ. राजेश वुक्कला(एमडी, जनरल फिजिशियन) यांना इटीव्ही भारत सुखीभवने यासंदर्भात शंका विचारल्या आणि त्यांनी आम्हाला खालीलप्रमाणे माहिती दिली.
कोविडमधून एकदा बरे झाल्यावर पुन्हा संसर्ग का शक्य आहे?
डॉ. वुक्कला म्हणाले की, गेल्या वर्षभरापासूनच कोविडचा विषाणू सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहे आणि आता जो नवीन उत्परिवर्तन झालेला विषाणु संसर्ग करत आहे, तो पहिल्यासारखा नाही. म्हणून, कोविड प्रतिबंधक लस किंवा पूर्वीच्या संसर्गाने तुमच्यात जी काही रोगप्रतिकारक शक्ति निर्माण झाली आहे, ती सामान्यपणे आढळणारी रोगप्रतिकारक शक्ति आहे आणि विशिष्ट जातीच्या विषाणुसाठी ती काम करणारी नाहि. त्यामुळे प्रथम कोविडमधून बरे झाल्यावरही तुम्हाला पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे, परंतु पहिल्यासारखा तीव्र संसर्ग आता असणार नाहि. एकदा विषाणुचा संसर्ग झालेली व्यक्ति तीन ते सहा महिन्यांपर्यंत अँटीबॉडीज स्वतःमध्ये विकसित करतो, असे अनेक तज्ञांकडून आणि माध्यमांतून दावा केला गेला आहे. याबाबत विचारले असता, डॉ. वुक्कला यांनी माहिती दिली की, कोविडचा पुन्हा संसर्ग नेमका किती काळानंतर होईल, याबाबत निश्चित काही ठरवता येणार नाहि. व्यक्तिचे वय, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ति, संलग्न परिस्थिती किंवा व्यक्तिला असलेले असाध्य आजार आणि विषाणुचे प्रमाण म्हणजे किती प्रमाणात त्यांना अगोदर संसर्ग झाला होता, या अनेक घटकांवर त्याला किंवा तिला पुन्हा संसर्ग होणे अवलंबून असते. त्याचप्रमाणे, एखाद्याच्या शरिरात विषाणु कोणत्या मार्गाने प्रवेश करतो आहे, यावरही संसर्गाची तीव्रता अवलंबून राहिल.
कोविड आजार झाला असताना आणि त्यातून बरे होऊन बाहेर आल्यावर किती काळ अत्यंत महत्वाचा आहे?
संसर्गाच्या पहिल्या दिवसापासून मोजायला सुरूवात केली तर तेथून ७ ते १४ दिवस अत्यंत महत्वाचे असतात, अशी आमच्या तज्ञांनी माहिती दिली. अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, शरिर कसा प्रतिसाद देते, यावर नजर ठेवण्यासाठी ७ वा ते ९ वा दिवस हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. शरिरात सहा दिवस मुक्काम केल्यावर विषाणुचे प्रमाण याच कालावधीत सर्वाधिक असते आणि त्यामुळे शरिरात दाहक प्रतिसाद निर्माण होतो. म्हणजे, शरिर विषाणुला सर्वाधिक प्रतिसाद देण्यास सुरूवात करते. याला सायटोकाईन वादळ असे म्हटले जाते. या सायटोकाईन वादळाच्या कालावधीत, शरिरात अनेक प्रकारची रसायने पाझरत असतात आणि परिणामी, त्यातून फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया, हगवणीसारखे आतड्याचे रोग निर्माण होतात, ह्रदयविकाराचा धक्का अशा अनेक दाहक प्रक्रिया सुरू होतात. डॉ. वुक्कला यांनी सांगितले की, कोविडमुळे मी एका रूग्णाच्या ह्रदयाचे ठोके १५० ते १६० बीपीएम इतके वर गेलेलेही मी पाहिले आहेत. या अवस्थेला Tachyarrhythmias असे म्हटले जाते. आणि, याच्या अगदी विरूद्ध, काही लोकांच्या ह्रदयाचे ठोके ३० ते ४० बीपीएम इतके खाली आलेलेही मी पाहिले आहेत. याला Bradyarrhythmias असे म्हटले जाते. मात्र या अवस्था खूप थोड्या कालावधीसाठी रहाणार्या असतात आणि या अवस्था निर्माण होण्याचे कारण मायोकार्डिटिस(ह्रदयातील दाह) हेच आहे, जे विषाणुच्या संसर्गापेक्षा दुय्यम आहे. कोविडमधून बरे झाल्यावर म्हणजे १४ दिवसांनी रूग्णांमध्ये गाठी निर्माण होण्याच्या समस्या दिसल्या आहेत, अशी माहितीही डॉ. वुक्कला यांनी दिली. या गाठी निर्माण झाल्याचा परिणाम मेंदू, ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसह शरिरातील इतर अवयवांवर होतो. यामुळे शरिराच्या चलनवलनातच अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ, मेंदूत गाठ निर्माण झाली तर त्याचा परिणाम मेंदूत रक्तस्त्रावात होतो आणि त्याचप्रमाणे ह्रदयविकाराचा झटका बसू शकतो. फुफ्फुसात गाठी निर्माण झाल्यास श्वसनक्रियेला झटका बसतो किंवा तिच्यात अवरोध निर्माण होतो. कोविडमधून बरे झाल्यानंतर दुसर्या आठवड्यात या प्रमुख समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोविडमधून बरे झाल्यावरही गाठी निर्माण होणे हा एक प्रमुख काळजीचा मुद्दा आहे. ज्या रूग्णांना विषाणुचा तीव्र संसर्ग झाला होता किंवा ज्यांना उपचारादरम्यान उत्तेजक देण्यात आले होते आणि ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण अनियंत्रित आहे, त्यांना कोविडमधून बाहेर आल्यावर म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगससाच संसर्ग होण्याचा आणखी एक काळजीचा मुद्दा आहे. म्हणून, जर तुम्हाला सायनस, चेहऱ्याच्या वेदना इत्यादी लक्षणे दिसत असल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरशी संपर्क साधा. रूग्णाच्या अवस्थेनुसार त्यावर उपचार करता येऊ शकतात.