हैदराबाद :गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार, सर्व शाळीग्राम शिलामध्ये वास्तु दोष दूर करण्याची खूप चांगली शक्ती आहे. मत्स्य शाळीग्राम, नारायण शाळीग्राम, गोपाल शाळीग्राम, सुदर्शन शाळीग्राम, सूर्य शाळीग्राम आणि वामन शाळीग्राम शिला आहेत. मोठ्या आकाराच्या जनार्दन शाळीग्राम, नरसिंह शाळीग्राम, वराह शाळीग्राम आणि सुदर्शन शाळीग्राम शिला हे विशिष्ट क्षेत्राची नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वात शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. असे मानले जाते की, हे खडक दूरवर समृद्धी, सुरक्षा आणि शांतता राखू शकतात. शाळीग्रामचे सुमारे 33 प्रकार आहेत, त्यापैकी 24 प्रकारचे शालिग्राम भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की, ज्या घरात शाळीग्राम असतो, तिथे दुःख कधीच राहत नाही. मात्र शाळीग्रामशी संबंधित काही नियमांचे पालन केले नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
शाळीग्राम शिला ठेवण्याचे फायदे :शाळीग्रामची पूजा केल्याने अध्यात्म प्राप्त होते. सुख-समृद्धीच्या इच्छेसाठी जर लोकांनी शाळीग्रामची पूजा केली तर त्यांना नक्कीच यश मिळते. शाळीग्राम पूजेने आर्थिक लाभ होतो. सांसारिक सुखेही प्राप्त होतात. शाळीग्राम घरात ठेवल्याने अनेक चमत्कारी फायदे होतात. ज्या घरात शाळीग्रामची पूजा केली जाते, त्या घरात लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. शाळीग्रामची पूजा करण्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत.