महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

Children Immune Systems : मुलांची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवणे आहे आवश्यक; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीला निरोगी ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर मुले वारंवार आजारी पडतात. पाच वर्षाच्या आतील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

By

Published : Apr 17, 2023, 5:21 PM IST

Children Immune Systems
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : अलिकडच्या काळात लहान मुलांना दीर्घकाळ आजाराचा सामना करावा लागतो. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे लहान मुलांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. पाच वर्षापर्यंतच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत मानली जाते. मात्र वाढत्या मुलांमध्येही आवश्यक प्रतिकारशक्तीचा अभाव दिसून येत आहे. खराब आहार आणि दिनचर्येतील खराब शैलीमुळे हे प्रकार होत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली नवले पुरंदरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी करा प्रयत्न :लहान मुलांमध्ये नेहमी आजारी पडण्याचे प्रकार वाढल्याने पालकांमध्ये चिंताजनक स्थिती असते. वारंवार आजारी पडण्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील होतो. केवळ कोविडच्या दुष्परिणामांमुळेच नाही तर सतत बदलत्या जीवनशैलीमुळेही गेल्या काही वर्षांत मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होत चालल्याचे मत डॉक्टर व्यक्त करतात. रोगप्रतिकारक शक्तीतील कमकुवतपणा हे मुलांमध्ये कोणत्याही संसर्गाचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळेच मुले लवकर आजारी पडण्याचे एक प्रमुख कारण असल्याचे इंदूरच्या बालरोगतज्ज्ञ डॉ सोनाली नवले पुरंदरे यांनी स्पष्ट केले आहे.

रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचे काय आहे कारण :गेल्या काही वर्षांत मुलांची आहारशैलीसह त्यांची दैनंदिन दिनचर्या अत्यंत आळशी झाल्या आहेत. आजकाल मुले घरातील ताज्या अन्नापेक्षा बाहेरचे अन्न, जास्त तेलकट मसाले आणि न शिजवलेले अन्न खाणे पसंत करतात. आजच्या युगात बहुतेक मुलांच्या रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि इतर पोषक तत्वांचा समावेश असलेल्या अन्नाचे प्रमाण कमी झाल्याचेही बालरोगतज्ज्ञ डॉ सोनाली नवले पुरंदरे यांनी स्पष्ट केले आहे. ही चिंतेची बाब असल्याचेही नवले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. याशिवाय मुलांचे घराबाहेर मैदानात खेळणेही कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असलेला व्यायाम, त्यांच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक हालचालींमध्येही घट झाली आहे. कोविडपासून बहुतेक मुलांच्या झोपेच्या उठण्याच्या वेळेत बदल झाल्याचेही डॉ सोनाली नवले यांनी स्पष्ट केले आहे.

केव्हाही खातात, केव्हाही झोपल्यामुळे होतो गंभीर परिणाम :आजकाल बहुतेक मुले अर्ली टू बेड, अर्ली टू राइज ही म्हण अंगीकारत नाहीत. केवळ वाचनासाठीच नाही तर खेळण्यासाठी त्यांचा बहुतांश वेळ मोबाईल फोन किंवा लॅपटॉपसमोर जातो. त्यामुळे त्यांची झोपण्याची वेळ आणि झोपेचा कालावधी या दोन्हींवर परिणाम होत आहे. तिथे ते केव्हाही खातात आणि काहीही खातात. अशा स्थितीत दृष्टी, डोकेदुखी, लठ्ठपणा, पचनसंस्थेशी निगडीत समस्या, सहज आजारी पडणे, ध्यानासारख्या समस्या आणि मधुमेहासारख्या समस्याही मुलांमध्ये अधिक दिसू लागल्या आहेत. मुले सतत आजारी राहिल्यामुळे अनेक मुलांना सतत औषधे घ्यावी लागत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही डॉ सोनाली यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिकारशक्ती कशी करावी चांगली :कोणताही आजार होऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. म्हातारपणात शरीर आणि मनाचा योग्य विकास होण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी केवळ मुलांसाठीच नाही तर त्यांच्या पालकांनीही त्यांचे आरोग्य, आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांची रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचेही डॉ सोनाली यांनी यावेळी नमूद केले आहे.

आहाराबाबत काळजी :मुलांमध्ये आहाराबाबत शिस्तीची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना पालेभाज्या आणि फळे असलेल्या घरगुती पौष्टिक, पचण्याजोगे अन्नाचे महत्त्व समजावून सांगून रोजच्या रोज घरच्या जेवणाला प्राधान्य देण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चीट डे आठवड्यातून एकदा ठेवता येतो. त्या दिवशी मूल स्नॅक्स किंवा त्याच्या आवडीचे अन्न खाऊ शकते.

पाणी पिण्याबाबत कशी घ्याल काळजी :मुलांना दिवसभरात आवश्यक प्रमाणात पाणी पिण्याची गरज समजावून सांगणे गरजेचे आहे. ते योग्य प्रमाणात पाणी पीत आहेत की नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण आपल्याला अनेक समस्यांपासून वाचवते. इतकेच नाही तर सर्व यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. त्यांची ऊर्जा देखील वाढते. पौष्टिक अन्न आणि पाणी दोन्ही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

कशी घ्यावी व्यायामाबाबत काळजी :मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांची शारीरिक हालचालही खूप महत्त्वाची असल्याचे डॉ सोनाली सांगतात. यासाठी बाहेर धावणे आणि खेळणे यापेक्षा चांगला मार्ग नाही. खेळ मुलांच्या आवश्यक शारीरिक आणि मानसिक विकासास मदत करतात. त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करतात. याशिवाय लहानपणापासून मुलांना योगासने किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची सवय त्यांच्या आयुष्यभरातील रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर ठरते.



झोपेचा नियम :मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचे नियम अंगीकारणे गरजेचे आहे. वेळेवर जागे होणे केवळ मुलांसाठीच नाही तर मोठ्यांनीही आवश्यक आहे. आजच्या काळात लहान मुले आणि वडिलधारी मंडळी, प्रत्येकाची झोप बहुतांशी कमी होऊ लागली आहे. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोबाईलचा सतत किंवा जास्त वापर करणे असल्याचे डॉ सोनाली स्पष्ट करतात. रात्रीच्या वेळी मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून मुलांना त्यांची झोप व्यवस्थित लागेल. इतकेच नाही तर दिवसभरात त्यांची स्क्रीन टाइमिंग निश्चित करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे झोपेच्या कमतरतेमुळे शरीराच्या जैविक घड्याळावर परिणाम होतो. लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी रात्री किमान सात ते आठ तासांची चांगली झोप आवश्यक असली तरी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी रोज ८ ते १० तास झोप घेणे आवश्यक मानले जाते.


स्वच्छता पाळायला शिकवा :चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी मुलांना शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे आणि त्याचे पालन करण्याची सवय लावणे देखील खूप महत्वाचे आहे. रोज आंघोळ करणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, आपले कपडे आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या स्वच्छतेची काळजी घेणे, घरात किंवा बाहेर काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्याआधी, बाहेरून घरी आल्यानंतर, खेळल्यानंतर किंवा कोणतेही काम केल्यानंतर हात धुणे गरजेचे आहे.

हेही वाचा - World Earth Day 2023 : जागतिक वसुंधरा दिन का साजरा करण्यात येतो, वाचा वसुंधरा दिनाचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details