हैदराबाद:पदार्थ तळून झाले की, एक प्रश्न कायमच असतो तो म्हणजे उरलेल्या तेलाचे काय करायचे? काही लोक म्हणतात, ते तेल भाजीआमटीला वापरुन टाकावे. काहीजण म्हणतात ते तेल न खाता सरळ फेकून द्यावे. कुणी त्यातच पुन्हा पुन्हा पदार्थ तळतात. यातले काय खरे आणि काय खोटे? बरेच लोक ते तेल पुन्हा एकदा गरम करून वापरतात. तळलेल्या तेलाचे नेमके करायचे? आणि मुळात म्हणजे एकदा पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरावे का? नेहमी आपण घरी पुरी, पकोडे किंवा तळण्याचे कोणतेही पदार्थ बनवतो तेव्हा उरलेले तेल पुन्हा वापरण्याची आपल्याला सवय असते. तर त्या प्रश्नाचे एकच उत्तर की पण ते तेल वापरणे आरोग्यासाठी अत्यंत घातक (Reheated oil can be very Dangerous to health) असू शकते.आहे. एकदा आपण ज्यात पदार्थ तळला, ते तेल उरले तर ते तेल अजिबात वापरू नये. असे पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असू शकते.
Health Tips : एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरत असाल तर सावधान! होतील 'हे' गंभीर आजार - Reheated oil
पदार्थ तळून झाले की, एक प्रश्न कायमच असतो तो म्हणजे उरलेल्या तेलाचे (used oil) काय करायचे? काही लोक म्हणतात, ते तेल भाजीआमटीला वापरुन टाकावे. काहीजण म्हणतात ते तेल न खाता सरळ फेकून द्यावे. तर त्या प्रश्नाचे एकच उत्तर की एकदा आपण ज्यात पदार्थ तळला, ते तेल उरले तर ते तेल अजिबात वापरू नये. असे पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक (Reheated oil can be very Dangerous to health) असू शकते.
तळलेले तेल पुन्हा पुन्हा का वापरू नये?: (Why not reuse fried oil again) पुन्हा पुन्हा गरम केलेल्या तेलाच कॅन्सर कॉजिंग एजंट, पॉलिसायकलिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतात ते हानीकारक घटक असतात. त्याने कर्करोग होण्याचा धोका बळावतो. तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असू शकते. त्या तेलाच्या पुर्नवापराने कॅन्सरसह अनेक घातक आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा गरम केल्याने तेलात विषारी प्रक्रिया सुरु होते. त्यातले चांगले घटक कमी होतात. पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरल्याने खराब कॉलेस्टेरॉल वाढते. म्हणून पुन्हा पुन्हा तळलेले तेल आरोग्याला अतिशय हानीकारक असते ते वापरू नये.
कॅन्सर होण्याची शक्यता: एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर ह्रदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ या सारख्या समस्या उद्भवू शकतात. तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनवले गेले तर, अशा तेलात फ्रि रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लॉक होतात.