महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आत्मक्लेष अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या', चिलगव्हाण येथील नागरिकांची मागणी - यवतमाळची सामुहिक आत्महत्या

चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबीयांसमवेत पहिली सामुहिक आत्महत्या केली होती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षीच्या अन्नत्याग आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

yavatmal
साहेबराव करपे

By

Published : Mar 18, 2021, 5:44 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे 19 मार्च 2021ला एक दिवसीय आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. या अंहिसात्मक आंदोलनाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी चिलगव्हाण येथे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

'आत्मक्लेष अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या', चिलगव्हाण येथील नागरिकांची मागणी..
राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या -महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे राज्यात १९ मार्च १९८६ ला चिलगव्हाण येथील प्रगतशील शेतकरी दिवंगत साहेबराव करपे पाटील यांच्या कुटुंबाची पहीली सामुहिक शेतकरी आत्महत्या प्रशासकीय नोंद झाली होती. त्या शेतकरी आत्महत्येची धग आजही कायम आहे. मागील पाच वर्षापासून साहेबराव करपे पाटील यांच्या स्मृतिदिनी मान्यवरांच्या व स्थानिक नागरीकांच्या वतीने सामुहिक श्रध्दाजंलीचा कार्यक्रम घेण्यात येतो. परंतु यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे 19 मार्च 2021 ला होणाऱ्या अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलनाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा अधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सरपंच पदमावती काळे, चिलगव्हाण, पोलीस पाटील लक्ष्मराव बोरकुटे, शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.हेही वाचा -जत तालुक्यात सापडला 900 वर्षापूर्वीचा चालुक्य सम्राट विक्रमादित्याचा शिलालेख

ABOUT THE AUTHOR

...view details