यवतमाळ - कोरोनाच्या संकटात आता अवकाळी पावसाने भर घातली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होत असून शेतकऱ्यांसह इतर नागरिकांवरही संकट ओढावले आहे.
दिवसभारपासून ढगाळी वातावरणाचे अवकाळी पावसात रुपांतर झाले असून सांयकाळी 5 च्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तत्पूर्वी दुपारच्या सुमारासही काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती.